लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

मराठा आरक्षण प्रश्न सुटेपर्यंत शासकीय नोकर भरती थांबवा :-सचिन खरात

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
              मराठा आरक्षणाचा प्रलंबित प्रश्न सुटे पर्यंत सर्व प्रकारची शासकीय नोकर भरती थांबवावी, अशी मागणी शिवसंग्राचे तालुका अध्यक्ष सचिन खरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात कारवाई न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सदर निवेदनद्वारे देण्यात आला आहे.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण लागू होत नाही तो पर्यंत राज्यातल्या सर्व प्रकारच्या निवडणुका बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या आहे. ओबीसी समाज बांधवांचे राजकीय भवितव्य धोक्यात येऊ नये या.काळजीपोटी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल सरकारचे आभार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष स्व. विनायकराव मेटे यांनी आयुष्यभर लढा दिला. शिवाय मराठा आरक्षणाच्या बैठकीला जात असताना त्यांचे अपघाती निधन झाले. स्व. मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभर तीव्र आंदोलने केली. प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा काढला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या अटीवर शिवसंग्राम पक्ष महायुतीत सामील आहे. मात्र अद्यापही मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे ५० टक्के मर्यादेत आरक्षण मिळू शकलेले नाही. परिणामी मराठा समाजातल्या अनेक गुणवंतांना शैक्षणिक व नोकऱ्यातील संधी पासून वंचित राहावे लागत आहे. हा खूप मोठा अन्याय मराठा समाजावर अनेक वर्षांपासून सुरु आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना
तत्कालीन महायुती सरकारने मराठा समाजाला ५० टक्के बाहेरील आरक्षण लागू केले, जे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडून विरोध नसताना देखील मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळू शकलेले नाही. किंबहुना मराठा आरक्षणबाबत राज्यसरकारची भूमिका उदासीन दिसत आहे. याबाबत खंत वाटते. मराठा समाजावर होणारा अन्याय थांबविण्यासाठी जो पर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही, तो पर्यंत सर्व प्रकारच्या शासकीय नोकरभरती पुढे ढकलण्यात यावी. व राज्यसरकारने प्राधान्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष सचिन खरात दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत