सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अवैध वाळू उपश्यावर कारवाई करा, मंठा तहसीलदार कैलासचद्र वाघमारे याच्या आशीर्वादाने वाळू उपसा जोरात महसूल व पोलीस प्रशासन कोमात नेमलेली पथके भूमीगत ,तळणी सरपंच सदावर्ते यांची मागणी



तळणी : रवी पाटील 
 तळणी परीसरातील पूर्णा नदी पाञातून चालू असलेल्या अवैध वाळू उपश्याची मंठा तहसीलदार यांना वारवार कल्पना देऊन सुध्दा त्यावर प्रतिबंध होत नसल्याने जिल्हाधिकार्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यानी सांगीतले सद्या सपूर्ण तळणी परीसरात अवैध वाळू रिचवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे मिळेल त्या ठिकाणी वाळू साठवण्याचा व विक्रीचा सपाटा लावला आहे या अवैध वाळू उपश्यास महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार असून अर्थ नितीच्या धोरणा मुळे या दोनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे गावामध्ये वाळू साठवताना सुसाट वाहने सुटत आहे तळणी बस स्टँन्ड परिसर व गावात येणारा एकमेव रस्ता असून या ठिकाणी नेहमी वर्दळ असते याच ठिकाणावरून वाळूचे वाहने सुसाट सुटत आहे दोनच दिवसा पूर्वी दोन पाळीव कुत्र्याच्या अंगावरून गाडी नेल्याचा प्रताप त्या रात्री घडला आहे राञीच्या वेळेत येणारी वाळूची वाहने ग्रामस्थासाठी ञासदायक ठरत आहे 
तहसीलदार गेले चार दिवसापासून भूमीगत झाल्यापासून त्यानी नेमलेले पथके सुध्दा भूमीगत झाले आहे वाळू माफीयांना उत्खननाची सधी मिळावी म्हणून तहसीलदार तीन दिवसापासुन गायब आहे पोलीस प्रशासनाचा कुठलाच धाक माफीयांना नसल्याकारणाने त्याचे फावत आहे 
देवठाणा उस्वद कानडी लिबंखेडा सासखेडा वाघाळा भूवन किर्ला टाकळखोपा हनवतखेडा केधळी पोखरी व अन्य पूर्णा नदी काठच्या गावामधून अवैध वाळू ऊपसा तहसीलदाराच्या कृपाद्रष्टीने चालू आहे 

अवैध वाळूची माहीती तहसीलदारांना देऊन सुध्दा कारवाई होत नाही तहसीलदार यांच्या बदलीच्या चर्चमुळे ते गेल्या चार दिवसापासून भूमीगत आहे महसुल प्रशासन व पोलीस प्रशासन व वाळू माफीयाच्या मधूर संबंधा मुळे वाळू माफीयांचे फावत आहे अवैध वाळू उपश्याची वाहने स्वःत अडवणार असल्याचे तळणी सरपंच गौतम सदावर्ते यानी सांगीतले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत