सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रामेश्वर मंदिरा समोर भक्तांनी उभा केला स्वखर्चाने सभा मंडप...

परतूर प्रतिनिधि कैलाश चव्हाण 
    दि .03 परतूर शहरातील रामेश्वर गल्लीतील शिवभक्तांनी तब्बल पाच लाख रूपये खर्च त स्वखर्चाने सभा मंडप उभा केला . 
      परतूर शहरातील गाव भागातील रामेश्वर मंदिराचा मोठा इतिहास आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात जिल्ह्याभरातून दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. पण या ठिकाणी सभा मंडप नसल्या कारणाने नागरिकांना तासन तास ऊन पाऊसा मध्ये उभा राहून दर्शन घ्यावे लागते. ही बाब निवृत्त साहाय्यक कृषी अधिकारी सदाशिव उर्फ सोनू भाऊ बरीदे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी गल्लीतील शिव भक्त यांची बैठक लावली व तात्काळ सभा मंडप उभा करायचा असे आवाहन केले. त्यांच्या हाकेला साथ देत सर्व युवक एक झाले व जवळपास पाच लाखाच्या वर लोकवर्गणीतून निधी जमा झाला व दोन महिन्यात काम पूर्ण करण्यात आले. आता या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तर होतच आहे त्याच बरोबर गोरबरीब नागरिकांचे लग्न देखील होत आहे. या मंदिराच्या सभागृहाची चर्चा पूर्ण शहरात होत आहे.
या युवकांनी दिले योगदान
बाळू रोहिणकर,राहुल मानवतकर,दीपक बरीदे, सौरव दसमले,शंतनू कपाळे,राम हारबक,गणेश सोनवणे, दिनेश बरीदे, आदित्य गवळी, रामा गवळी, सचिन गवळी, प्रल्हाद गवळी, शशिकांत बरीदे,दीपक शाहीर,
या जेष्ठ नागरिकांनी दिली साथ.
रमाकांत बरीदे, महादेव बरीदे, सुभाष बरीदे, पांडुरंग कानापुडे, महारुद्र स्वामी, मुकुंद शेपाळ, शिवलिंग राऊत,जगन गवळी, सतीश गुजर, रमेश गवळी,शिवा बल्लमखाने , चंद्रकांत बल्लामखने,सतीश गवळी, गणेश हनवते, माजी नगरसेवक प्रकाश चव्हाण, रामभाऊ रोहिणकर,कृष्णा सोनवणे, योगेश काटे, प्रल्हाद कापाले, नंदलाल कापाळे, चंद्रकांत कपाळे,

मागील काही वर्षात शिव भक्त शहरातील शिव मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहे. ही चांगली बाब आहे युवकांनी पुढाकार घेतल्याने रमेश्वर मंदिर येथील सभागृह झाले आहे.
किसनराव बरीदे
निवृत्त सहाय्यक कृषी अधिकारी 
         प्रतिक्रिया
महिलांची गैरसोय टळणार
पवित्र आशा श्रावण महिन्यात महिला भक्तांची मोठी गर्दी या ठिकाणी होत असते पण सभा मंडप झाल्याने आता श्रावण महिन्यात वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होतील यातून एक चांगला संदेश जाईल
ह. भ. प.गायबाई महाराज परतूर कर
        प्रतिक्रिया
 समाजातील घटक जोडून त्यांच्यावर चांगले संस्कार घडले पाहिजे या साठी या सभा मंडपात आम्ही सर्व युवकांना एकत्र करून मार्गदर्शन करत असत. सभामंडप उभारणी साठी युवकांनी जे काम केले आहे ते अभिमानास्पद आहे.
पांडुरंग कानपुडे 
शिव भक्त.

गाव भागातील रामेश्वर मंदिर हे पूर्ण परतूर शहराची शान आहे. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात त्यांची गैरसोय आता टळणार आहे.
रमाकांत बरीदे.
रामेश्वर मंदिर हे तीर्थ क्षेत्र म्हणून जाहीर करावे या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या साठी शासन दरबारी मागणी करणार आहोत. 
शिवलिंग राऊत
नागरिक परतूर

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत