सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड


परतूर : प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी सकल राजस्थानी समाजाच्या वतीने नवा मोंढा भागात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येणार आहे या महोत्सवात यावेळी अनेक धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येणार आहे महोत्सवाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली या मधे          अध्यक्ष : शरद भारूका, उपाध्यक्ष:- गोविंद मुंदडा विष्णू झवर , सचिव: शुभम चित्तोडा कोषाध्यक्ष:- रोहित अग्रवाल, सहसचिव:- जितू मोर, सर्वेश मोर स्वगतध्यक्ष:- रितेश अग्रवाल , :
मार्गदर्शक म्हणून योगेश खंडेलवाल,सौरभ बगडिया गोविंद झवर आनंद कोटेचा यांची एकमुखाने निवड करण्यात आली. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले यात गरबा नृत्य, भजनांचा कार्यक्रम, आयोजित केले असल्याचे अध्यक्ष शरद भारूका यांनी माहिती दिली.
सदस्य:- सकल राजस्थानी समाज परतुर

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत