सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट......मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी,परतूर येथे मोर्चा.....



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेषित मोहम्मद तसेच अल्लाह यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर लीहल्याने  शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला  यावेळी समाजाच्या वतीनेपोलीस  प्रशासना व उपविभागीय अधिकारी यांना  निवेदन देण्यात आले.
   उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हंटले आहे की जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात दिनांक 05 ऑक्टोंबर रोजी गणराज नाईक पाटील या युवकाने स्वतच्या मोबाईल वरून मुस्लिम समाजाचे प्रेषित मुहम्मद पैगंबर,अल्लाह व हजरत फातेमा यांच्या विरोधात अश्लील व अपमान जनक पोस्ट करून सोशल मीडियावर प्रसारित केली आहे यामुळे देशातील सर्व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून तसेच हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवून आणण्याचा हेतू असल्याचेही निवेदनात म्हटले आहे तसेच या कृत्या मागे कोणाचे षडयंत्र आहे याची सखोल चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे 
तत्पूरवी शहरातील मलांगशाह चौकातून मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो मुस्लिम समाजासह इतर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते मोर्चा दरम्यान पोलीस निरीक्षक  सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत