इंटरनेट बंद असल्यामुळे तळणी परिसरात आनेक घटकावर परीणाम,अन्न त्याग उपोषणाचा तीसरा दिवस

तळणी : (रवि पाटील)
   गेल्या आठ दिवसापासुन आतरवाली सराटी येथे चालू असलेल्या मराठा आरक्षणाचा उठावाचे लोण आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहाचले असून त्याचा परीणाम सार्वजनीक व्यवस्थेवर पाहावयास मिळत आहे तळणी हे परीसरातील बाजारपेठेचे मोठे गाव विस बावीस गांवाचे आर्थीक व्यवहार याच ठिकाणावरून चालतात गेल्या दोन दिवसापासुन इंटरनेट सेवा बंद असल्याने बँकीग व्यवहारावर मोठा परीणाम झाल्याने व्यवस्था ठप्प झाली आँनलाईन कामकाज बंद आहे असल्या कारनाने कोट्यवधी रुपयाची उलाढाल ठप्प झाली नियमीत मोबाईल चा वापर करणारी तरुणाई माञ विदर्भाच्या सिमेवर जाऊन मोबाईल बघण्याच्या नादात गर्क होती,

तळणी येथे चालू असलेल्या अन्नत्याग उपोषणाचा आजचा तिसरा दिवस नानासाहेब खंदारे हे गेल्या तीन दिवसापासुन अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, उपोषण स्थळी किर्तन भजन सुरु करण्यात आले, आहे तळणी परीसरातील अंनेक गावातील सकल मराठा समाजातील तरुण या उपोषणात सक्रीय सहभाग घेत आहेत 


आज गुरूवार रोजी देवठाणा येथील असख्य मराठा तरुणानी सर्वपक्षीय नेत्याची आठ गावावरून धिडं काढली देवठाणा येथून निघालेली धिडं याञा तळणी येथे उपोषण स्थळापर्यन्न वाजत गाजत आणली मराठा तरुणाच्या गगनभेदी घोषणानी परीसर दणानुन गेला 

बस बंद 
बस बंदचा फटका या दोन दिवसात मोठया प्रमाणात जाणवला बाहेर गावी जाणार्याना खासगी वाहनाचा वापर करावा लागला तर काही प्रवासाचा बेतच रद्द केला . बस बंद मुळे खाजगी वाहनाची माञ मोठी चांदी झाली तर प्रवाश्यात माञ नाराजी दिसुन आली गेल्या दोन तीन दिवसापासुन बंद असलेल्या अनेक सेवामुळे बाजारपेठेवर मोठा परीणाम दिसून आला मराठा आरक्षणाची धग आता ग्रामीण भागात पोहचल्याने सरकार याची दखल घेणार तरी कधी ? असा प्रश्न मराठा समाजातील तरुण विचारत आहे 
सरकारचा निषेध म्हणून तळणी येथे अनेक तरुणानी मुंडन करुन सरकारचा निषेध केला 

मराठा समाजाने हे आंदोलन शांततेने करावे कुठलाही अनुचीत प्रकार आपल्या हातातून घडू नाही याची दक्षता सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यनी घ्यावी असे आवाहन उपोषण कर्त्य नानासाहेब खंदारे यानी केले आहे

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश