सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

डॉ इशा विष्णू कदम हिया सत्कार

   परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
  येथील शिक्षक विष्णूपंत कदम यांची मुलगी डॉ इशा ही संभाजीनगर येथे MBBS मध्ये गेल्या चार वर्षा पासून शिक्षण घेत आहे नुकतेच आता आलेल्या निकाला मधे विष्णूपंत कदम यांची कन्या MBBS च्या अतीम वर्षात उत्तर्णी झाली आहे 
    दि.1 एप्रील रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुर च्या वतीने डॉ इशा विष्णुपंत कदम MBBS उत्तीर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर जी नवल परतुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मगर विष्णुपंत कदम सूर्यकांत जी निर्वळ श्री रामेश्वर दिरंगे आदींची उपस्थिती होती
   या सत्कारा नंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुरचे तालूकाध्यक्ष दिलीप मगर सर यांनी शुभेच्छा देतांना सांगीतले की अमचे सहकरी शिक्षक विष्णूपंत कदम यांच्या मुलीने MBBS परीक्षेत यश मिळवून कदम परिवाची मान उंचावली आहे व तीने या पुढे MD ची शिक्षण घेऊन परतूरकरांची सेवा करावी आशी अपेक्षा डॉ इशा कदम कडून केली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत