सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

निवडणूक निरीक्षकांची परतूरला भेट


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
  दि.१५ - लोकसभा निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी सोमवारी नवोदय विद्यालयात सुरु असलेल्या प्रशिक्षणास भेट दिली.
    लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सध्या जोरात सुरु आहे. नियुक्त करण्यात आलेले कर्मचा-यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या सभागृहात निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.दि.१५ व १६ एप्रिल असे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी प्रशिक्षण सुरु असताना निवडणूक निरीक्षक विष्णुकांत यांनी प्रशिक्षण ठिकाणी भेट देऊन एकंदरीत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी मनिषा दांडगे, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, सोनाली जोंधळे, नायब तहसीलदार विजयमाला पुपलवाड, चिंतामण मिरासे, विनोद भालेराव,संतोष पवार,रुस्तुम बोनगे, बाबासाहेब तरवटे यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत