सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुर येथील विवेकानंद प्राथमिक व माध्य.शाळेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.


परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
परतुर येथील विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग विषयीचे महत्त्व योगशिक्षक श्री गजानन वायाळ यांनी विशद केले. योगसाधनेचे मूळ उगम स्थान भारत देश आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना जर योगाच्या अभ्यास करण्यास गोडी लागली,योगाभ्यास जर करू लागले तर निश्चितपणे राग, द्वेष, चिडचिडपणा,नकारात्मक मानसिकता या बाबी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणार नाहीत तेव्हा ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्त्व पटवून देणे ही काळाची गरज आहे.यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व हालचाली योगासने सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी सहभागी होऊन योग दिवस साजरा केला.यावेळी उपस्थित शाळेचे अध्यक्ष डॉ शेषराव  बाहेकर, मुख्याध्यापिका संगीता शिंदे शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
दरम्यान विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये विविध व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी विविध कार्यक्रम ,ऍक्टिव्हिटी होत असतात त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस देखील अतिशय उत्साहामध्ये साजरा केला.दरम्यान भारताने जगाला दिलेली ही देन आहे, योगामुळे मन प्रसन्न होते. काम करण्यास ऊर्जा मिळते. ताण-तणावाने धावपळीच्या जीवनामुळे हृदयविकारासह अनेक आजार माणसांना जडले जातात यावर मात करण्यासाठी प्रत्येकाने आनंदी राहणे गरजेचे आहे. तणावमुक्त जीवनासाठी योगा अत्यंत गरजेचे आहे.म्हणून प्रत्येकाने वेळ काढून योगा करत आनंदी जीवन जगा, मस्त रहा स्वस्थ रहा, जबरदस्त राहण्याचा सल्ला यावेळी योगशिक्षक गजानन वायाळ यांनी दिला.
दरम्यान योगशक्तीमुळे सकारात्मक मानसिकता होते शरीरामध्ये एक नवचैतन्य आणि ऊर्जा प्राप्त होते विचार कृती शुद्ध होतात समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन योगामुळे शक्य आहे योग आपल्याला वर्तमान क्षणांमध्ये राहण्यासाठी आनंदी राहण्यासाठी मदत करत असल्याचे यावेळी योग दिनाच्या निमित्ताने शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शेषराव बाहेकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत