सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

किर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांचे 110 व्या वर्षी निधन

जिल्हा  प्रतिनिधी समाधान खरात

घनसावंगी तालुक्यातील कोठाळा येथील सुप्रसिध्द कीर्तनकेसरी भारतीदास हभप साहेबराव आश्रोबा साबळे (कोठाळकर) महाराज यांचे वयाच्या 110 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि २६ जुन २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले.

त्यांच्या पाश्चात्य तिन मुले, तिन मुली, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्याच्यावर दि २७ जुन रोजी सकाळी दहा वाजता मूळ गावी कोठाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
       कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ग्रामीण शहरी भागात समाज प्रबोधन केले. संतांचे विचार आपल्या शब्दात मांडून समाज घडविण्याचे कार्य केले आहे. कीर्तनकेसरी हभप साहेबराव महाराज कोठाळकर यांच्या निधनाने संप्रदायात शोककळा पसरली आहे. जालना येथील प्रयाग हॉस्पिटलचे डॉ.रामेश्वर साबळे यांचे ते वडील होत.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत