लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

नगर परिषद परतुरच्या 45 रोजंदारी कामगारांच्या सेवेत समावेशनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. , शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
नगर परिषद परतुर येथे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात जवळपास तीस वर्षापासून रोजंदारी वर काम करणार्‍या मजुरांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे शासनाचे विविध धोरण येऊन देखील सेवेत समावेशन होऊ शकले नाही. 
हताश होऊन या कर्मचाऱ्यांनी उपोषण,  आंदोलन करूनही या लोकांना कोणी न्याय दिला नाही.
वर्ष 2022 मधे मा. एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारल्या नंतर शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांनी या रोजंदारी करणार्‍यांपैकी काही प्रतिनिधींना घेऊन थेट वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री साहेबांसमोर या कर्मचाऱ्यांना सर्व पुराव्यासह घेऊन गेल्यानंतर नोव्हेंबर 2022 मधे मा. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी फेर तपासणी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.  
त्यानंतर विविध स्तरावरून सर्व बाबींच्या तपासणीअंती या 45 दुर्लक्षित रोजंदारी कर्मचार्‍यांना शासनाचे धोरणात्मक निर्णयाचा लाभ होऊन सेवेत समावेश होण्याच्या अनुषंगाने शासनाच्या अवर सचिव यानी जा. क्र. 365/नवि17 दि. 18 जून 2024 रोजी आयुक्त तथा संचालक मुंबई आणि विभागीय आयुक्त छ. संभाजीनगर यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. 
जिल्हाप्रमुख अग्रवाल यानी या गोरगरिबांना त्यांचा हक्क मिळावा म्हणुन दोन वर्षांपासून शासन स्तरावर सतत पाठपुरावा करीत अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत