लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

स्वाभिमानी पक्षाची मराठवाड्यातील विधानसभेची पहिली उमेदवारी घोषित


  जालना / प्रतिनिधी : समाधान खरात 
   येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या उमेदवारांची घोषणा आज जालना येथे कार्यकारणी बैठकीत करण्यात आली.भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात ५० पेक्षा अधिक जागा लढवणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार रोजी जालना येथे संपन्न झाली. याबैठकीत मराठवाड्यातील पहिल्या उमेदवाराची घोषणा आज जालन्यातून करण्यात आली.
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी बैठक जालना येथील एका हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर्जमाफ करून सातबारा कोरा करावा. या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान एक जुलैपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. 
    तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढवण्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच बारामती येथील राज्य कार्यकारणी बैठकीत केली आहे. त्या अनुषंगाने मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा जिल्हा कार्यकारणी बैठकीत करण्यात आली.भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी मयूर बोर्डे यांच्या नावावर शिक्कामोर्तब स्वाभिमानीच्या संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती.
    या जिल्हा कार्यकारणी बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नदोरे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे, जिल्हा सचिव पांडुरंग गटकळ,राज्य कार्यकारणी सदस्य शिवाजी भोसले, विधानसभा उमेदवार मयूर बोर्डे, काकासाहेब साबळे,तालुकाध्यक्ष उमेश पाष्टे, गणेश राजबिंडे,सुभाष भोपळे,प्रदीप नरवाडे,शरद पंडित,राजू बनकर,समाधान गाढवे,किशोर पंडित,बाबासाहेब दखणे,भारत उंडे, सुनिल कवडे आदींची उपस्थिती होती.
भोकरदन विधानसभेचे उमेदवार मयूर बोर्डे यांच्या विजयाचा संकल्प करून सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत