सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
जुन्या आठवणींना उजाळा देत लाल बहादूर शास्त्री विद्यालय, परतूर 2004 च्या दहावी ‘ब’ बॅच तर्फे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा दिनांक 18.08.2024 रोजी हॉटेल कृष्ण मोती येथे आयोजित करण्यात आला होता. तब्बल 20 वर्षानंतर सर्व माजी विद्यार्थी एकत्र आले होते. बालपणीच्या आठवणीत रमलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुललेले दिसत होते.  उपस्थित सर्वांचे पारंपरिक पद्धतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दिवंगत शिक्षक आणि दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात  आली. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.  
 तद्नंतर माजी विद्यार्थ्यांनी आपला वैयक्तिक परिचय करून दिला. अनेकांनी आपल्या शैलीत तर कोणी मिश्किल पणे जुन्या आठवणींना उजाळा दिला. मूळचे परतूरचे परंतु सध्या नौकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असलेले विद्यार्थी आपल्या जुन्या मित्रांच्या भेटीच्या ओढीने परतूर मध्ये परतले होते. या निमित्याने हॉटेल कृष्ण मोती येथे स्नेह्भोज कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
दुपारनंतर सर्वांनी शाळेला भेट दिली. तेथे सर्वांची गमतीदार पद्धतीने हजेरी घेण्यात आली. शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. परत एकदा भेटू असा संकल्प घेत सर्वांनी एकमेकांचा भावपूर्ण निरोप घेतला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत