सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची विभागीय आट्या-पाट्या स्पर्धेसाठी निवड.


परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य आयोजीत  राज्यस्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा आट्या-पाट्या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या न्यू वंडर किड्स इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज परतूर संघाची विभागीय स्तरावर निवड झाली.
झालेल्या निवडी बद्दल संस्थे तर्फे विद्यार्थी व क्रिडा शिक्षक विजय चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
सत्करा प्रसंगी कार्याध्यक्ष म्हणाले की, आपली कामगिरी  पाहून आम्हा सर्वांना आपला खुप अभिमान वाटत आहे अशीच कामगिरी करत आपण प्रत्येक यशाचे शिखर गाठीत जावे व आपणास पुढील वाटचालीस शभेच्छा.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष नारायण  सोळंके, संस्थेचे कर्याध्यक्ष गणेश सोळंके, संस्था सचिव छाया बागल, मुख्याध्यापक साम वर्गीस, क्रिडा शिक्षक विजय चव्हाण व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते व सर्वांनी पुढील वाटचालीसाठी आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत