सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शास्त्री विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप


परतूर -प्रतीनीधी कैलाश चव्हाण
 येथील छत्रपती शिवाजीनगरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गुरुवारी (दि. 6) भावपूर्ण निरोप देण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक हरिओम कोरके हे होते.
    तर प्रमुख पाहुणे म्हणून त्र्यंबक घुगे,रामराव पवार, किरण गवई, पंडितराव निर्वळ,आसाराम धुमाळ,दत्तात्रय आकात,मधुकर वखरे, अरुणकुमार वावरे इतरांची उपस्थिती होती.
     यावेळी समृद्धी गाडगे, आदिती कंठाळे, आरुषी ठोके, पांडुरंग बिल्हारे, वैष्णवी मुजमुले आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. तर अरुणकुमार वावरे, मधुकर वखरे, आसाराम धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी ढोबळे यांनी केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा धुमाळ, संस्कृती धुमाळ यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत