सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पाडळी शिवारात शेती रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागनी, गावकऱ्यांच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
तालुक्यातील पारधी पाडळी येथील शिवारात शेतकऱ्यांना शेतात रस्ता करून देण्याची मागणी येतील ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
   यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे पाडळी पारधी या गावचे पुनर्वसन परतूर वाटूर रोडवर नागापूर पाटीजवळ झालेले आहे. सदरील पुनर्वसन ते जुने पाडळी गाव हें सहा किमी अंतरावर बसलेले आहे. पुनर्वसन येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या जुन्या गावाजवळ आहेत. जवळपास ५०० ते ६०० एकर जमीन या रस्त्यावर वहिती करणे अवलंबून आहे. गावात जाणारा सहा किमी प्रयन्त शेतरस्ता पूर्ण खराब झाला आहे, त्या पैकी दोन किमी रस्ता झाला आहे. उर्वरित चार किमी रस्ता पूर्णपणे खराब झाला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे पुनर्वसन येथिल शेतकऱ्यांना आपली शेती वहिती करण्यासाठी रस्ता नसल्याने शेतमाल वाहतून करणे व वाहतूकसाठी अडचणीत येत आहे. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होत असल्यामुळे शेतकऱ्याचे हाल होत असल्याने पाडळी गावाच्या शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी चार किमी रस्ता त्वरित करुन द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर सरपंच प्रसाद काकडे , उपसरपंच शामराव काळे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मस्के, भास्कर बोराडे, संदीप मस्के, रमेश काकडे, वैभव बोराडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रतिलिपी आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधीकरी, उपविभागीय अधिकारी परतूर यांना दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत