सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्याचे युनेस्को तर्फे जागतिक वारसा(Heritage) म्हणून निवड झाल्याबद्दल परतूर भाजपा तर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 
परतूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित सर्वांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त करून अभिनंदन करण्यात आले.
भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक डॉ. स्वप्नील बी. मंत्री यांनी प्रास्ताविक करतांना ही गोष्ट समस्त शिवप्रेमींसाठी अभिमान व गौरवाची गोष्ट असे सांगून बारा किल्ल्यांच्या स्थापत्य कलेवर प्रकाश टाकत सरकारच्या विविध स्तरावरील प्रयत्नांची व 12 किल्ल्यांची सविस्तर माहिती दिली ह्या माध्यमातून पर्यटन वाढीला लागेल आणि हिंदवी स्वराज्य महती जागतिक पातळीवर पोहोचल्याबद्दल सर्वांच्या वतीने हर्षोल्लास व्यक्त केला...
भाजप तालुका संघटन सरचिटणीस सावता काळे यांनी पुढे बोलतांना अखंड हिंदुस्तान आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा लष्करी भूप्रदेश या संकल्पनेंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यांनी पुढे सांगितले की देशातील व महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती की महाराजांचा ज्वलंत इतिहास येत्या काळात विदेशातील शिवभक्त देखील महाराजांचा आदर्श घेतील, त्यासाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परतूरचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर, महाराष्ट्राचे युवा नेते राहुल भैया लोणीकर यांच्या यशस्वी प्रयत्नाने व देशातील कर्तबगार अधिकारी यांनी १२ किल्ल्यांच्या बाजूने जी २० मते मिळवून दिली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
ह्यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते भगवान तात्या मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध कार्याचा उल्लेख करत हा क्षण सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते ओमप्रकाश मोर, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष राजू म्हस्के, भाजपा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष अजित पोरवाल, भाजपा तालुका उपाध्यक्ष ॲड सुरेश काळे, भाजपा शहर सरचिटणीस आनंद कोटेचा, भाजपा शहर उपाध्यक्ष अमोल अग्रवाल, अभिजित जोशी, गणेश अग्रवाल, मुन्ना चित्तोडा, गोविंद मोर, बंडू मामा नवल व नागरिक उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत