सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दिवंगत पत्रकारांच्या नावे स्तभ बनवा-विकासकुमार बागडी

जालना प्रतिनीधी समाधान खरात
  जालना शहरात दिवंगत पत्रकारांच्या नावे एकही स्तंभ नसून या पत्रकारांचे मोलाचे योगदान राहिलेले असून त्यासाठीच त्यांच्या ही नावे शहरात एखादा तरी स्तंभ असावा आणि तो जालना शहर महापालिकेकडे व्हाईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विकासकुमार बागडी यांनी केली आहे.
यासंदर्भात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, जालना जिल्ह्यात सामाजिक आणि राष्ट्रीय काम करणारे सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, स्वातंत्र्य सैनिक, उद्योजक, माजी सैनिक आदींच्या नावाने शहरात अनेक रस्ते, चौक, कमान बांधण्यात आलेले आहेत. पण या सर्वांची कामाची प्रसिध्दी करणारे चौथा स्तभ म्हणजेच पत्रकारितेच्या नावे कुठेही आणि कोणत्याही चौकात किंवा रस्त्यावर एकही स्तभ नाही. जालना शहराच्या मध्यभागी म्हणजेच टाऊन हॉल येथे पत्रकारांसाठी स्वतंत्र स्तंभ उभारण्यात यावा, जिल्ह्यात दिवंगत झालेल्या पत्रकारांच्या नावे असा पत्रकार स्तंभ असेल तर तो चांगलाच आहे.
शशिकांत पटवारी, उदय पटवारी, लक्ष्मण पायगव्हाणे, गणेश जळगांवकर, सतीष सुदामे, दिगंबर शिंदे, रमण गायकवाड, मनोहर बुजाडे, श्रीकृष्ण भारुका, शेख अलीम, अबुल हसन, राजे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत