सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नियम डावलून घेण्यात आलेली निवडणूक पुन्हा घेण्याची सभासदांची मागणी,सहकार आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी



परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या निवडणुकीत नियम डावलून निवडणूक घेण्याचा आरोप करत सभासदांनी सहकार आयुक्त यांना लेखी निवेदन सादर करत निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली आहे 
निवेदनात असे म्हटले आहे की, सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या. परतूर ता. परतूर जि. जालना या संस्थेच्या निवडणुक प्रक्रियेचा वेळ,अंतिम मतदार यादी नावे समाविष्ट पत्र वाटप वेळ सकाळी १०.३० ते ११.००, प्राप्त नामनिर्देशन पत्र छाननी करणे स. ११.०० ते ११.१५., छाननी अंतिम पात्र उमेदवारांची नावे घोषित करणे सकाळी ११.१५ ते ११.३०., नामनिर्देशन पत्र माघारी घेणे सकाळी ११.३० ते १२.००, निवडणुक लढविणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी घोषित करणे दुपारी १२.०० ते १२.१५., मतदानाची वेळ दुपारी १२.१५ ते १.१५., मत मोजणीची वेळ दुपारी १.१५ ते संपेपर्यंत तरी या भ्रष्ट निवडणुक अधिकारी  आ.सां.गुसिंगे व बी. टी. लिंगायत यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करुन व निवडणुक नियमाचे उल्लंघन करुन दुपारी तीन वाजेच्या नंतर मतदान प्रक्रियेला सुरुवात करुन एकतर्फी निवडणुक प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे सदरील भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन करुन फेर निवडणुक करण्यात यावी व या झालेल्या निवडणुकीची उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही झालेल्या निवडणुकीवर बहिष्कार टाकलेले सर्व सभासद जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु, होणाऱ्या परिणामास आ.सा. गुसिंगे व बी.टी. लिंगायत हे स्वतः जबाबदार राहतील याची शासनाने नोंद घेण्याचे ही सांगण्यात आले.


निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रियेचे जवळपास सर्वच नियम डावलून व सभासदांना विश्वासात न घेता निवडणूक प्रक्रिया पार पाडली यासर्व प्रकारामागे आर्थिक देवाण घेवाण झाली आहे. तसेच प्रशासनाने या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी तसेच जंगम मालमत्ता त्याब्यात घ्यावी. प्रशासनाने याप्रकरणी चौकशी करून झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करून पुन्हा नव्याने निवडणूक प्रक्रिया करण्यात यावी प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास सहकारी सभासदांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल तसेच न्यायालयात सुद्धा दाद मागण्यात येईल अशी प्रतिक्रिया सागर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्या.परतूरचे सभासद सागर काजळे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत