आंबा येथे 6 गाईंचा मृत्यू, विजेचा शॉक लागल्याने घडला अनर्थ,बैलपोळ्याच्या उत्साहावर पडले विरजण

आंबा प्रतिनिधी कैलाश बोनगे
आंबा येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो मात्र यावर्षी बैल मिरवायच्या वेळेलाच अचानकपणे काळाने घाला घालत विजेचा शॉक लागून सहा गाईंचा मृत्यू झाल्याने पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून गावातील मोकाट गाई अचानकपणे मृत झाल्यामुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत
    शेतामध्ये रानडुक्कर येऊ नयेत यासाठी लावलेल्या कुंपणा शेजारी या गाई गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना गावात घडल्यामुळे गावावर शोक काळा पसरली असून गावातील
बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे पारंपरिक पद्धतीने या गावांमध्ये नियमितपणे वेगळ्या उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो या ठिकाणची कृषक आपल्या बैलांना सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढत असतात या गावातील पोळ्याला एक वेगळी महत्त्व असून मारुतीचे मंदिर नसणारे हे परतुर तालुक्यातील एकमेव गाव आहे या गावांमध्ये बागेश्वरी मातेचे दर्शन करून पोळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले असून यावर्षीची बैलांची पूजा घरचे घरी करताना आढळून आले यासंदर्भामध्ये युवा मोर्चा कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्याशी चर्चा केली असता यावर्षीचा पोळा आनंदात साजरा करण्याच्या मी ठरवले होते परंतु काळाने घाला घालत अचानकपणे सहा गोमातेचा मृत्यू झाल्यामुळे आमचं संपूर्ण गाव दुःखाच्या सागरात बुडालेली असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती