लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

आंबा येथे 6 गाईंचा मृत्यू, विजेचा शॉक लागल्याने घडला अनर्थ,बैलपोळ्याच्या उत्साहावर पडले विरजण

आंबा प्रतिनिधी कैलाश बोनगे
आंबा येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने अतिशय उत्साहामध्ये बैलपोळा साजरा केला जातो मात्र यावर्षी बैल मिरवायच्या वेळेलाच अचानकपणे काळाने घाला घालत विजेचा शॉक लागून सहा गाईंचा मृत्यू झाल्याने पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले असून गावातील मोकाट गाई अचानकपणे मृत झाल्यामुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले आहेत
    शेतामध्ये रानडुक्कर येऊ नयेत यासाठी लावलेल्या कुंपणा शेजारी या गाई गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असून अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना गावात घडल्यामुळे गावावर शोक काळा पसरली असून गावातील
बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडले आहे पारंपरिक पद्धतीने या गावांमध्ये नियमितपणे वेगळ्या उत्साहामध्ये पोळा हा सण साजरा केला जातो या ठिकाणची कृषक आपल्या बैलांना सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढत असतात या गावातील पोळ्याला एक वेगळी महत्त्व असून मारुतीचे मंदिर नसणारे हे परतुर तालुक्यातील एकमेव गाव आहे या गावांमध्ये बागेश्वरी मातेचे दर्शन करून पोळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते मात्र अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे गावकरी दुःखाच्या सागरात बुडाले असून यावर्षीची बैलांची पूजा घरचे घरी करताना आढळून आले यासंदर्भामध्ये युवा मोर्चा कार्यकर्ते प्रशांत बोनगे यांच्याशी चर्चा केली असता यावर्षीचा पोळा आनंदात साजरा करण्याच्या मी ठरवले होते परंतु काळाने घाला घालत अचानकपणे सहा गोमातेचा मृत्यू झाल्यामुळे आमचं संपूर्ण गाव दुःखाच्या सागरात बुडालेली असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत