शेतकरी, कष्टकरी,महीला सबलीकरण या सह सर्वसामान्या चा वीचार करानारा अर्थसंकल्प- मा . मंत्री आ. बबनराव लोणीकर



प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्याला विकासाच्या उंच शिखरावर घेऊन जाणारा असून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी महिला युवक उद्योग या सर्वांना उभारी मिळणार असून, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी अर्थसंकल्पामध्ये 20,000 हजार कोटी रुपयांची तरतूद,
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कार्यान्वित करणार,
कोकणातील पाणी मराठवाड्यात नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आणले जाणार,मराठवाड्यासाठी घर घर जल योजना,शेतकरी सन्मान योजनेत केंद्राच्या 6000 हजाराबरोबरच राज्यही देणार 6000 त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार आता वार्षिक 1200 हजार रुपये मदत,शेतकरी ,महिला, युवकांना सशक्त करणारा अर्थसंकल्प,अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये 1500 रुपयांची वाढ,राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांना होणार लाभ,महिलांना एसटी बस तिकिटामध्ये 50 टक्क्यांची सूट,महिलांना सशक्त करणारा अर्थसंकल्प,महिला बचत गटांना करणार सक्षम,माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत चार कोटी महिलांची मुलींची आरोग्य तपासणी करणार,मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना आता नव्या स्वरूपात, जन्मानंतर 5000 तर पहिल्या वर्गात गेल्यानंतर चार हजार तर सहाव्या वर्गात 6000 अकरावीत आठ हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर मिळणार 75000,शेतीला समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी योजने अंतर्गत 29 हजार 163 कोटी रुपयांची तरतूद,मोदी घरकुल योजनेअंतर्गत 10 लाख घरे गरिबांना उपलब्ध होणार,आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून 01 लाख 50 रुपया ऐवजी 05 लाख रुपयांची मदत रुग्णांना होणार,
राज्याला खऱ्या अर्थाने समृद्धीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प,
माजी मंत्री आमदार बबनराव लोणकर

    घर घर जल या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील नागरिकांना नळ जोडणी देण्यात येणार असून मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या प्रकल्पाचा पाठपुरावा करत मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून देवेंद्रजींनी व्यक्त केलेला आहे
महिला सक्षमीकरणाचा ध्यास घेत बचत गटांसाठी ही घसघशीत अशा तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आले असून राज्यातील 81 हजार अंगणवाडी सेविकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली असून आता यापुढे पाच हजार पाचशे इतके मानधन अंगणवाडी सेविकांना मिळणार असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
यापुढे महिलांना एसटी प्रवासाच्या तिकिटामध्ये 50 टक्के सूट देण्यात आलेली असून
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार लाख घरे नव्याने बांधण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्रजी यांनी म्हटले असून हा निर्णय स्वागतार्य असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे
  पुढे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राज्यभरात ७०० दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला राज्यभरात ७०० दवाखाने उभारले जाणारा असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दिली जाणारी दीड लाखाच्या मदतीमध्ये घसघशीत वाढ करण्यात आली असून आता ही मदत पाच लाख रुपयांपर्यंत रुग्णांना मिळणार तर आहे असेही माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असून यातून शेतकरी महिला युवक दिन दलित पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार असून या संकल्पचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी भरभरून कौतुक केले आहे
शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची वार्षिक मदत करत असते या मदतीत आता राज्य सरकारी वाटा उचलणार असून राज्याचे सहा आणि केंद्राचे सहा असे 12 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प शेतकरी भिमुख असून राज्याचे मुख्यमंत्री एकानाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आभार मानले 














  

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती