सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार निवडपत्राचे मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण!


जालना प्रतिनिधी समाधान खरात 
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६' चे जालना जिल्ह्यातील पुरस्कार्थीना आज मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करून निवडपत्र प्रदान करण्यात आले. 
 सर्वप्रथम दिपप्रज्वलन आणि प्रतिमा पुजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्यसमन्वयक भगवान जायभाये यांनी केले.बदनापूरचे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, घनसावंगी चे गटशिक्षणाधिकारी रवी जोशी, समता शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण जोशी, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जालना जिल्हाध्यक्ष मंगेश जैवाळ यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र शिक्षक पॅनल आणि पुरस्कार्थी श्रीम. साधनाताई गिऱ्हे, विकास पोथरे, श्रीनिवास सुदेवाड, निलेश सोमवंशी, भाऊसाहेब खाडे, शामराव टेकाळे, रणधीर पाटील, भाऊसाहेब कोलते, सिद्धार्थ म्हस्के, श्रीम. स्नेहल पवार, श्रीम दीपाली जोंधळे, श्रीम फरहत तांबोळी, निर्वती भालेकर, मनोहर विरकर, आवेज पठाण या शिक्षकांचे अभिनंदन तसेच कौतुक केले.
       हा पुरस्कार जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे अध्यक्षीय भाषणात जालना शिक्षक पतसंस्था चेअरमन जगत घुगे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालना शिक्षक पतसंस्था सचिव संतोष देशपांडे तर आभारप्रदर्शन जिल्हा समन्वयक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जालना शिक्षक पतसंस्था संचालक जगन्नाथ शिंदे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुकाध्यक्ष सुनील साबळे,महाराष्ट्र शिक्षक पॅनल प्रतिनिधी मन्मथ होनराव आदींनी परिश्रम घेतले.
        या निवडीबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि पालक स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत