सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

घनसावंगी तालुका भाजयु मोर्चा च्या सरचिटणीसपदी राम खांडे


घनसावंगी( प्रतिनिधी )
घनसावंगी तालुका भारतीय जनता युवा मोर्चा पक्षाच्या तालुका सरचिटणीसपदी  तालुक्यातील म चिचोली येथील पक्षाचे क्रियाशील व सक्रिय युवा कार्यकर्ते राम खांडे यांची निवड करण्यात आली . या निवडी बाबतचे पत्र  माजी मंत्री  तथा आमदार बबनराव लोणीकर, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शना खाली   युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुजित जोगस यांनी निवड केली या प्रसंगि  माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती सर्जेराव जाधव , यांनी शूभेच्छा दिल्या भाजपा  किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे , भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री शिवराजभैया नारियलवाले , भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश तौर , भाजपा युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष गोविंद ढेंबरे,भाजपा युवा मोर्चा चिटणीस रामेश्वर सोळंके , विनोद दळवी , रफिक  उपस्थित होते   खांडे यांनी निवडी योग्य ते न्याय मिळवून देऊ आसे आपले मत व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत