धर्माबाद ते मनमाड (मराठवाडा) एक्स्प्रेस गुरूवारीपासून धावणार...



परभणी, दि. 22 (प्रतिनिधी) ः दक्षिण मध्य रेल्वेने बंद केलेली धर्माबाद - मनमाड - धर्माबाद (मराठवाडा एक्स्प्रेस) ही विशेष एक्स्प्रेस रेल्वे गुरुवारपासून (दि. 24) पुन्हा धावणार आहे.
दरम्यान, ऐनदिवाळीतच बंद केलेली मराठवाडा एक्स्प्रेस ही रेल्वे प्रवाशांसह संघटनांच्या जोरदार मागणीनंतर दक्षिण मध्य रेल्वेस सुरू करावी लागली. 
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदे़ड ते पनवेल या एक्स्प्रेस पाठोपाठ मराठवाड्यातील रेल्वेप्रवाशांच्या सोयीकरिता धर्माबाद ते मनमाड व मनमाड ते धर्माबाद ही विशेष रेल्वे दिवाळीपुर्वी सुरू केली होती. मात्र, ऐन दिवाळीतच ती काही न सांगता प्रतिसाद नसल्याचे कारण देत अचानक बंद केली होती. मात्र, सर्वांच्याच पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनास ती पुन्हा सुरू करावी लागली.
ही रेल्वे धर्माबादहून सकाळी चार वाजता निघणार आहे. नांदेड स्थानकावर पाच वाजून 28 मिनिटांनी, पूर्णेत सहा वाजून तीन मिनिटांनी, परभणीत सहा वाजून 38 मिनिटे, मानवतरोड सहा वाजून 57 मिनिटे, सेलूत सात वाजून 17 मिनिटे, परतूर सात वाजून 44 मिनिटे, रांजनी सात वाजून 54 मिनिटे, जालना आठ वाजून 48 मिनिटे, बदनापूर नऊ वाजून 09 मिनिटे, मुकूंदवाडी 9 वाजून 45 मिनिटे, औरंगाबाद येथे नऊ वाजून 55 मिनिटांनी, लासूर येथे दहा वाजून 30 मिनिटे, रोटेगाव 11 वाजून 30 मिनिटे, नगरसोल 12 वाजून 20 मिनिटे, अंकई 12 वाजून 49 मिनिटे व मनमाड रेल्वे स्थानकावर एक वाजून 20 मिनिटांनी पोचेल.
मनमाड येथून दुपारी तीन वाजता परतीच्या प्रवासास निघेल. अंकई येथे दुपारी तीन वाजून 18 मिनिटे, नगरसोल दुपारी तीन वाजून 40 मिनिटे, रोटेगाव तीन वाजून 49 मिनिटे, लासूर चारवाजून 19 मिनिटे, औरंगाबाद येथे पाच वाजून 50 मिनिटांनी, मुकूंदवाडी सहावाजून 11 मिनिटे, बदनापूर सहा वाजून 36 मिनिटे, जालना सहा वाजून 50 मिनिटे, रांजनी सात वाजून 14 मिनिटे, परतूर सात वाजून 29 मिनिटे, सेलू सात वाजून 51 मिनिटे, मानवतरोड आठ वाजून चार मिनिटे, परभणी आठ वाजून 43 मिनिटे, पूर्णा येथे नऊ वाजून 33 मिनिटांनी, नांदेड येथे दहा वाजून आठ मिनिटे, उमरी 11 वाजून 10 मिनिटे व धर्माबाद येथे रात्री 12 वाजून दहा मिनिटांनी ही एक्प्रेस पोचेल.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश