लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

युवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*

===================
परतूर (प्रतिनधी) युवमोर्चा कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवता येईल त्या साठी युवा मोर्चा ने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले 
 ते परतूर येथे युवमोर्चा च्या संघटनात्मक बैठकीत बोलत होते
या वेळी व्यासपीठावर हर्षल जी विभांडीक(संयोजक, आत्मनिर्भर भारत), हर्षवर्धन कराड(जिल्हा प्रभारी) भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, ता अध्यक्ष शत्रुघन कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले संपत टकले तुकाराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी युवा युवती यांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की युवा वारियर्स युवा मोर्चा ची संकल्पना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असून युवा वारियर च्या माध्यमातून 18 ते 24 वयोगटातील युवकांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्या बरोबरच वॉरियर्स मध्ये असलेली सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले
   या वेळी हर्षलजी विभांडीक म्हणाले की,  प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळुवून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही योजना फलदायी असून योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचे सांगतानाच या साठी युवकांनी विधायक प्रयत्न करणे गरजे असून विविध योजना संदर्भात त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले
   या वेळी हर्षवर्धन कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस या सह जिह्यातील पदाधिकारी उपस्थतीत होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत