सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

युवकांनी आत्मनिर्भर च्या माध्यमातून सक्षम व्हावे* *प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर,युवकांनी समर्पित भावनेने काम करावे ; - हर्षल जी विभांडीक,*परतूर येथे युवा मोर्चाची संघटनात्मक बैठक संपन्न*

===================
परतूर (प्रतिनधी) युवमोर्चा कार्यकर्त्यांनी आत्मनिर्भर भारत योजनेचा लाभ ग्रामीण भागातील युवकांना देण्यासाठी पुढाकार घेऊन काम केल्यास खऱ्या अर्थाने बेरोजगार युवक युवतींना आत्मनिर्भर बनवता येईल त्या साठी युवा मोर्चा ने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले 
 ते परतूर येथे युवमोर्चा च्या संघटनात्मक बैठकीत बोलत होते
या वेळी व्यासपीठावर हर्षल जी विभांडीक(संयोजक, आत्मनिर्भर भारत), हर्षवर्धन कराड(जिल्हा प्रभारी) भाजपा तालुकाध्यक्ष रमेश भापकर,जिल्हाध्यक्ष सुजित जोगस, ता अध्यक्ष शत्रुघन कणसे अविनाश राठोड विक्रम उफाड योगेश ढोणे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियल वाले संपत टकले तुकाराम सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना राहुल लोणीकर म्हणाले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश आत्मनिर्भर बनवण्यासाठी आत्मनिर्भर भारत च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी युवा युवती यांना विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध आहेत त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत योजना पोहोचवण्याचे काम करावे असेही ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की युवा वारियर्स युवा मोर्चा ची संकल्पना प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असून युवा वारियर च्या माध्यमातून 18 ते 24 वयोगटातील युवकांना भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्या बरोबरच वॉरियर्स मध्ये असलेली सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही ते म्हणाले
   या वेळी हर्षलजी विभांडीक म्हणाले की,  प्रत्येक युवकांच्या हाताला काम मिळुवून देण्यासाठी आत्मनिर्भर भारत ही योजना फलदायी असून योजनेच्या माध्यमातून युवक युवतींना स्वयंपूर्ण होण्याची संधी असल्याचे सांगतानाच या साठी युवकांनी विधायक प्रयत्न करणे गरजे असून विविध योजना संदर्भात त्यांनी या वेळी मार्गदर्शन केले
   या वेळी हर्षवर्धन कराड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
  यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस या सह जिह्यातील पदाधिकारी उपस्थतीत होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत