सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शितला माता पूजनामध्ये मारवाडी समाजाने दक्षता घ्यावी-विकासकुमार बागडी


जालना : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा साजरी होत असलेल्या शितला माता पूजेच्यावेळी मारवाडी समाजाने शासकीय नियम पाळून हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मारवाडी समाजामध्ये शितला माता पुजनाला अनन्य साधारण असे महत्व आहे. हा उत्सव वर्षातून एकदाच साजरा होतो परंतू कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव साजरा करतांना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याचे कारण असे की, या उत्सवानिमित्त समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती हा शितला मातेचे दर्शन या दिवशी घेतच असतो. यंदा हा उत्सव सोमवार दि. २९ मार्च २०२१ रोजी येत असून शहरात शितला मातेचे केवळ काद्राबादेतच एकमेव मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परंतू यावर्षी गर्दी करता येणार नाही, याची खबरदारी मारवाडी समाजातील प्रत्येक कुटुंबियांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी घ्यावी. दर्शनास येतांना मास्कचा वापर जरुर करावा, सॅनिटायझर हाताला लावावे आणि सुरक्षित अंतरावर राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, याशिवाय शुगर, बीपी, दमा आणि अन्य प्रकारच्या आजाराने ग्रासलेल्यांनी घरुनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करुन श्री. बागडी यांनी शितला माता मंदिराचे नगर परिषदेच्यावतीने दोन वेळा सॅनिटायझर फवारणी करुन द्यावी, अशी मागणीही श्री. बागडी यांनी केली आहे.

        


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत