न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रम संपन्न

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा  न्यू वंडर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज परतुर मध्ये गुरुपौर्णिमा निमित्त "जीवनातील गुरुचे महत्व" या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा या मंत्रावर शास्त्रीय पद्धतीने नृत्य सादर करून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.  नृत्य दरम्यान इयत्ता दहावीची विद्यार्थिनी संस्कृती संतोष झरेकर हिने जीवनातील गुरुचे महत्व सांगून शाळेतील सर्व शिक्षक वृंदाचे आभार मानले. या कार्यक्रमा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष  नारायण  सोळंके ,संस्थेच्या सचिव छाया बागल तसेच व्हॉइस प्रिन्सिपल पूजा मोरे, शिक्षकवृंद व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

शितला माता पूजनामध्ये मारवाडी समाजाने दक्षता घ्यावी-विकासकुमार बागडी


जालना : गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा साजरी होत असलेल्या शितला माता पूजेच्यावेळी मारवाडी समाजाने शासकीय नियम पाळून हा उत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. विकासकुमार बागडी यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात श्री. बागडी यांनी म्हटले आहे की, मारवाडी समाजामध्ये शितला माता पुजनाला अनन्य साधारण असे महत्व आहे. हा उत्सव वर्षातून एकदाच साजरा होतो परंतू कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर हा उत्सव साजरा करतांना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्याचे कारण असे की, या उत्सवानिमित्त समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्ती हा शितला मातेचे दर्शन या दिवशी घेतच असतो. यंदा हा उत्सव सोमवार दि. २९ मार्च २०२१ रोजी येत असून शहरात शितला मातेचे केवळ काद्राबादेतच एकमेव मंदिर असल्यामुळे या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. परंतू यावर्षी गर्दी करता येणार नाही, याची खबरदारी मारवाडी समाजातील प्रत्येक कुटुंबियांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी घ्यावी. दर्शनास येतांना मास्कचा वापर जरुर करावा, सॅनिटायझर हाताला लावावे आणि सुरक्षित अंतरावर राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, याशिवाय शुगर, बीपी, दमा आणि अन्य प्रकारच्या आजाराने ग्रासलेल्यांनी घरुनच दर्शन घ्यावे, असे आवाहन करुन श्री. बागडी यांनी शितला माता मंदिराचे नगर परिषदेच्यावतीने दोन वेळा सॅनिटायझर फवारणी करुन द्यावी, अशी मागणीही श्री. बागडी यांनी केली आहे.

        


Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत