सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जालना जिल्हा शिवसंग्रामची कार्यकारणी बरखास्त... तानाजीराव शिंदे प्रदेश अध्यक्ष,जिह्यातील जेष्ठ नेते व कार्यकर्त्याशी वीचार वीनीमय करून नवीन कार्यकारणि निवडावी-सचिन खरात


परतुर- जालना जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी सोबत बैठक घेऊन चर्चा केल्यानंतर जालना जिल्यातील शिवसंग्रामची जिल्हा कार्यकारिणी सोबतच युवक, महिला, विद्यार्थी, कामगार, किसान, अल्पसंख्याक व सामाजिक न्याय आघाडीसोबत,जिल्ह्यातील सर्व आधाइया आणि सेलच्या जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणी काल दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी आमदार विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशाने  बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आगामी काळामध्ये संघटना वाढीसाठी व येणाऱ्या काळातील

निवडणुका,महानगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती या लक्षात घेऊन जे संघटना वाढीसाठी योगदान देतील अशा सक्षम कार्यकर्त्यांच्या निवडी लवकरच जिल्ह्यातील सर्व नेते, कार्यकर्ते यांच्याशी विचार विनिमय करून जाहीर केल्या जाव्यात   अशी विनंती वीद्यार्थी संघटनेचे माजी तालूकाध्यक्ष सचिन खरात  परतुर यांनी केले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत