लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

महाराष्ट्र सरकारने योग्य बाजू सुप्रीम कोर्टात न मांडल्याने मराठा आरक्षण रद्द झाले-आमदार बबनराव लोणीकर


सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण आज रद्द करण्यात आले देवेंद्रजी फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस व आम्ही सर्व सहकारी यांनी विधानसभा मध्ये आरक्षण संबंधित कायदा केला जो एकमताने मंजूर करण्यात आला.

मराठा आरक्षण साठी, मराठा समाजासाठी जे जे होईल ते प्रामाणिकपणे मराठा आरक्षण न्याय मिळवून देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सर्व सहकारी मंत्री मंडळाने  केले

परंतु आताच्या राज्यसरकारने मराठा आरक्षण बाबत योग्य न्यायिक भूमिका न घेतल्याने सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केले, वारंवार वकील अनुपस्थित राहणे, तारखा विनाकारण वाढवून मागणे अश्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या.

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची योग्य बाजू न मांडल्यानेच मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आजचा दिवस संपूर्ण मराठा समाजासाठी दुर्दैवी आणि काळा दिवस आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत