सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर जाहिर करा-कॉ.आर.बी.आढाव



      परतूर(प्रतीनीधी) विज कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषीत करण्यात यावे आशि मागणि वीभागिय सचिव कॉम्रेड रमेश आढाव यांनी केली
                परतूर  येथे विज उद्योग क्षेञातील काम करणारे सर्व कर्मचारी,अभियंते,अधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहिर करावे.लसीकरणाची सुविधा प्राधान्याने उपलब्द करुन देण्यात यावी.विज कर्मचारी यांच्यावर कोरोना आजारपणात बेडची उपलब्धता करुन देण्यात यावी.तसेच औषधोपचाराची सुविधा अधिक प्राधान्याने पुरवण्यात यावी.या मागण्यांसाठी महावितरण कंपनीच्या परतूर उपविभागीय कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली.
      यावेळी 
.एन.व्ही.बेंडाळे(उपकार्यकारी अभियंता),.प्रविण गणेर (सहाय्यक अभियंता),मंगेश रामटेके(सहाय्यक अभियंता)
कॉ.आर.बी.आढाव(विभागिय सचिव),कॉ.के.पी.कुलकर्णी,कॉ.नाथा साकळकर,कॉ.किसन यादव,कॉ.योगेश मोरे,कॉ.बि.एस.दोन्डे,कॉ.मनोज शिंदे,कॉ.सय्यद नौशाद व इतर सभासद व कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत