सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍या वाळू माफीयांवर कडक कारवाई करा,परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी मार्फत पोलिस अधिक्षकांना निवेदन


 
परतूर –प्रतिनिधी
जाफ्राबाद येथील दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर वाळू माफीयांनी केलेल्या झालेल्या भ्याड हल्लाचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची मागणी परतूर पत्रकारांच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांच्या मार्फत पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि ११/०६/२०२१ रोजी जाफराबाद येथील पंचायत समिती कार्यालय समोर दैनिक पुढारीचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश्वर वामनराव पाबळे यांच्यावर वाळु माफीयांनी लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जिवघेण्या हल्ला करण्यात आला आहे. तसेच वाळुच्या बातम्या का छापतो म्हणून जबर मारहाण केल्याने ज्ञानेश्वर पाबळे यांच्यासह इतर जण मारहाणीत जखमी झाले आहेत. जखमीवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. पत्रकार ज्ञांनेश्वर पाबळे यांच्यावर औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार सुरू आहेत. गेल्या वर्षाभरापासून वाळु माफियांनी दहशत निर्माण केली असून यामध्ये महसुल व पोलीस प्रशासन सहभागी आहे. समाजहितासाठी पत्रकारांनी अवैध वाळु उत्खनन बाबत आपल्या दैनिकात बातमी प्रकाशात केल्यामुळे याचा इतर पत्रकारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस या घटनेत वाढ होत असून वाळु चोरीचा सर्रास प्रकार सुरु आहे. अशा अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या विरोधात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्लाचा निषेध व्यक्त करत पत्रकार सरंक्षण कायद्या अंतर्गत संबंधीत वाळू माफियावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी परतूर पत्रकाराच्या वतीने करीत या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. या निवेदनावर राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे. सचिव दीपक हिवाळे, एम.एल. कुरेशी, अजय देसाई, राजकुमार भारुका, भारत सवने, आशीष धुमाळ, मुन्ना चितोडा, रामप्रसाद नवल, अशोक साकळकर,राहुल मुजमुले, सरफराज नाईकवाडी, माणिक जैस्वाल, प्रभाकर प्रधान, सागर काजळे, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, आशीष गारकर, इम्रान कुरेशी, शेख अथर, संजय देशमाने, गणेश लालझरे, यांच्यासह आदि पत्रकार उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत