सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मुलांना शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे. – राजकुमार तांगडे


परतूर प्रतिनिधी(हनुमंत दवंडे)
 : मुलांना टक्केवारीच्या मागे धावायला लावून. आपण आपल्या उत्तपनाचा 60 % हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत आहोत.  नोकर्या मिळवन्यासाठी मुलांना शिकवू नका तर त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी शिक्षिति करा. शिक्षणा सोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन येणोरा येथील कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेते,लेखक,नाटककार राजकुमार तांगडे यांनी केले. स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित स्थानिक कलावंत आणि सामाजिक विषयावर प्रबोधन करणार्या कलाकाराचा सन्मान सोहळा  कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. मुलांचे शिक्षण,आरोग्य, पोषण, बालविवाह,बाल मजुरी या विषयावर जिल्हातील गावा –गावात जाऊन कलापथक आणि पथनाट्यच्या माध्यमातून जनजागृती करणार्या हरिभाऊ गायके, श्रद्धा वाघमारे, शरद शाळवे, गणेश घोडे, गणेश वाघमारे, किशोर घोडे, गोविंद जोगदंड आणि सचिन पाटोळे या कलाकारांचा राजकुमार तांगडे, संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंजाळ, मा. संरक्षण अधिकारी एकनाथ राऊत, गजानन तालुका अध्यक्ष  शाहीर घोडके यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे व्यवस्थापन सरपंच विष्णू गायकवाड, उपसरपंच सुरेश भुंबर, गौतम पाटील(पो.पा.), सिमाताई जोगदंड अंगणवाडी सेविका,भागवत जोगदंड,भागवत भुंबर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेच्या संस्कृतिक विभागाचे प्रवृतक प्रमुख भास्कर साळवे, कार्यक्रम अधिकारी माधव हिवाळे, कला विभागाचे प्रमुख सोमेश सोनटक्के, आणि विठ्ठल सुभेदार हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत