सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंठा महा.वीज वितरण कंपनीचा कारभार बेभरोसा- शेतकऱ्यांची विज अभावी पिके करपू लागली



 मंठा (सुभाष वायाळ)दि.27 मंठा तालुक्यातील महा.विज वितरण कंपनीचा कारभार हा परतुर या ठिकाणावरून सध्या चालत आहे. मंठा येथील अधिकृत अधिकारी म्हणून पदावर असणारे मुख्यअभियंता श्री खंडागळे यांची बदली होऊनबरेच दिवस ओलांडले आहेत. तरी आतापर्यंत कुठलेही अधिकारी त्या पदावर रुजू झाले नाही. मंठा तालुक्यातील चार्ज हा परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांच्याकडे आहे. ते मंठा येथे चार्ज घेतल्यानंतर फिरकलेच नाही.मंठा महा. विज वितरण कंपनी मध्ये शेतकरी व नागरिक त्यांच्या कामा करिता गेले तर तेथील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. व सध्या चार्ज परतुर येथील अधिकाऱ्याकडे आहे. आम्ही काही करू शकत नाहीत. त्यांना येऊ द्या नंतर तुम्ही तुमचे काम सांगा असे सांगून वेळ मारून नेत आहेत. सध्या तालुक्यामधील बऱ्याचशा शेतकरी नागरिकांची नवीन वीज जोडणी, मीटर खराबी,विज बिल वाढ, विज बिल दुरुस्ती, नवीन ट्रांसफार्मर (डीपी)घेणे, ट्रांसफार्मर(डीपी.)दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज पुरवठा ही रात्री केला जात आहे.त्यामध्ये ही बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.अशी अनेक कामे रखडलेली आहेत. तरी त्वरित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

 चौकट
 मंठा येथे प्रभारी असलेले परतुर येथील अभियंता श्री बेंडाळे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. परंतु त्यांनी त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही. सामान्य शेतकऱ्यांना तर त्यांचा भ्रमणध्वनी नंबर ही मंठा कार्यालयात कोणी देत नाही.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत