सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तळणि येथीलआदर्श तथा शिस्तप्रिय शिक्षक एस.टी. पाटील सर यांचे निधन

तळणी(प्रतीनीधी) येथील आदर्श शिक्षक एस टी (श्रीकृष्ण त्र्यंबंकराव पाटील) पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मूत्यू समई त्याचे वय ७८ वर्षाचे होते त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली एक भाऊ नांतवंडे असा मोठा परिवार होता तळणी येथील केद्रीय प्राथमिक शाळेचे केद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष कारभार साभांळला कडक शिस्तीचे पाटील सर म्हणून ते सर्वाचे परिचीत होते संगळ्याना सोबत घेऊन चालणे व कितीही मोठी संकट आले तर त्याला सहजपणे सामोरे जाणे ही त्याची विशेषता त्यानी मोठया प्रमाणात घडवलेल्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे समाजातील प्रत्येक स्तरातील अनेक जणासोबत त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्याच्या जाण्याने एक शिस्तप्रिय शिक्षक आम्ही गमावला अशा प्रतिक्रीया त्याच्या सहकारी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या त्याच्या अंतिम सस्कारासाठी अनेक मान्यवरानी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली तळणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच उध्दवराव पवार यानी आदरांजली वाहून आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवारी ठीक नऊ वाजता करण्याचे ठरले आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत