सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तळणि येथीलआदर्श तथा शिस्तप्रिय शिक्षक एस.टी. पाटील सर यांचे निधन

तळणी(प्रतीनीधी) येथील आदर्श शिक्षक एस टी (श्रीकृष्ण त्र्यंबंकराव पाटील) पाटील सर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले मूत्यू समई त्याचे वय ७८ वर्षाचे होते त्याच्या पश्चात दोन मुले दोन मुली एक भाऊ नांतवंडे असा मोठा परिवार होता तळणी येथील केद्रीय प्राथमिक शाळेचे केद्रीय मुख्याध्यापक म्हणून अनेक वर्ष कारभार साभांळला कडक शिस्तीचे पाटील सर म्हणून ते सर्वाचे परिचीत होते संगळ्याना सोबत घेऊन चालणे व कितीही मोठी संकट आले तर त्याला सहजपणे सामोरे जाणे ही त्याची विशेषता त्यानी मोठया प्रमाणात घडवलेल्या विद्यार्थ्याची संख्या मोठी आहे समाजातील प्रत्येक स्तरातील अनेक जणासोबत त्याचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्याच्या जाण्याने एक शिस्तप्रिय शिक्षक आम्ही गमावला अशा प्रतिक्रीया त्याच्या सहकारी शिक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या त्याच्या अंतिम सस्कारासाठी अनेक मान्यवरानी अंतिम दर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली तळणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच उध्दवराव पवार यानी आदरांजली वाहून आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या त्याच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवारी ठीक नऊ वाजता करण्याचे ठरले आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत