सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि, पटोले यांना तात्काळ अटक करा,त्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी पटोले यांची धडपड, अटक न केल्यास भाजपाच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन - लोणीकर


प्रतिनिधी-हनूमंत दंवडे
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या विरोधात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो अशा शब्दात गरज ओळखली असून नाना पटोले यांचे वागणे म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशा स्वरूपाचे आहेत त्यांना तात्काळ अटक करून महाराष्ट्र सरकारने लोकशाही जिवंत आहे असे महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आज केले

सत्तेचा माज आणि मस्ती चढल्यानंतर आपण काय बोलतो याचे भान राहात नाही आणि तीच अवस्था काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची झाली असून नाना पटोले यांच्या बुद्धिचा भोपळा झालेला आहे संपूर्ण राज्यभरात नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले असून नाना पटोले यांना तात्काळ अटक न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असेही लोणीकर यावेळी म्हणाले

देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची मान जगभरात उंचावली असून देशाला आर्थिक महासत्ता जागतिक महासत्ता बनवण्यासाठी मोदीची प्रयत्नशील आहेत असे असताना केवळ गांधी घराण्याला खूष करण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वारंवार नाना पटोले यांच्या कडून मोदींच्या विरोधात गरळ ओकली जात आहेत परंतु आता त्यांच्या पापाचा घडा भरला असून मोदीजीं वरील यापुढे सहन केली जाणार नाही असेही लोणीकर यावेळी म्हणाले

 लहान लहान वक्तव्यावरून महाराष्ट्रात महाल कास आघाडी सरकारने अनेकांना अटक केली आहे तर मग नाना पटोले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल जी गरळ ओकली त्याबद्दल अटक का नाही? केवळ सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आहे काय? त्यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकार गुन्हा दाखल करणार का? की लोकशाहीचा गळा घोटून नाना पटोले यांना महाराष्ट्र सरकार अभय देणार? असा सवाल देखील लोणीकर यांनी उपस्थित केला आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत