सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतुरात 1990 च्या वर्ग मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार संपन्न प्रत्यक्ष व झूम मिटिंग द्वारे मित्रांनी केले पाल्यांचे कौतुक

परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 जि. प.प्रशाला शाळेच्या सन 1990 च्या वर्गमित्रांचे स्नेहमिलन कार्यक्रम 25 डिसेंबर 2019 ला संपन्न झाला होता. या सर्व मित्रांचा व्हाट्सअप्प च्या माध्यमातून संपर्क कायम राहिला. या मित्रांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ हॉटेल आस्वाद येथे पार पडला.
परतूर येथील मित्र प्रत्यक्षपणे तर बाहेरगावातील मित्र झूम ऍप प्रणाली द्वारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद येथील व्यावसायिक राहुल कुंपावत होते. या प्रसंगी सार्थक काशीनाथ देशमुख याचा कॉम्प्युटर सायन्स ला आणि सुशांत संदीप बाहेकर व नरेंद्र प्रशांत अंभुरे याचा MBBS ला प्रवेश झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जीवनातील सुख ,आनंद वाढविण्यासाठी व दुःख कमी करण्यासाठी मित्रासारखे नाते नाही. त्यामुळे सदरील नात्याला बळकटी देण्यासाठी मित्रांच्या गुणवंत मुलांचे कौतुक केलेच पाहीजे. याप्रसंगी नगरसेवक संदीप बाहेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत अंभुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे समारोप राहुल कुंपावत यांनी केला. याप्रसंगी संतोष चव्हाण, केदार शर्मा, सुनील मोर, परवेझ देशमुख, पुरुषोत्तम राठी,अनिल कुलकर्णी, प्रकाश खालापूरे,रमेश ठोंबरे, शामसुंदर चित्तोडा, राम देशपांडे, काशिनाथ देशमुख, उपस्थित होते तर डॉ.सतीश मुंदडा, राहुल कुलकर्णी, आनंद आसोलकर व इतर झूम प्रणाली द्वारे सहभागी होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामा माने यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत