सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

हातडी शिवारात बिबट्याची भटकंती;शेतकर्‍यात भितीचे वातावरण,शोधमोहिम सुरू शेतकर्‍यांना काळजी घेण्याचे आवाहन

परतूर (आशिष धुमाळ)
तालुक्यातील हातडी शिवारात 11 मार्च शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास गावातील सचिन शिंदे सह काही शेतकर्‍यांना शेतात काम करत असतांना बिबट्या निदर्शनास पडला.या घटनेला सरपंच मधुकर झरेकर यांनी दुजोरा दिला आहे. बिबट्याची व्हिडिओ क्लिप परतूर परिसरात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
         परिसरातील शेतात बिबट्याच्या पायाचे ठस्से सुध्दा दिसल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.गावकर्‍यांनी व सरपंच मधुकर झरेकर यांनी बिबट्या आढळ्याची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे व्हि.पी. अवचार घनसावंगीचे वनरक्षक पवार व वनमजुर यांनी हातडी शिवारात हजर होत पायाच्या ठस्यावरून बिबट्याचा शोध सुरू केला आहे. शेतकर्‍यांनी एकटे शेतात जाऊ नये तसेच पाळीव प्राण्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच मधुकर झरेकर व वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत