सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तीन दिवसीय गीता रामायण सत्संग सोहळा,या ऐतिहासिक क्षणाचे भागिदार बना-परमपूज्य महान तपास्वी संत श्री योगानंद बापू



तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
येथून जवळच असलेल्या दहिफळ खंदारे(ता.मंठा) येथे परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांचे शिष्य श्री.आनंद चैतन्य महाराज,श्री हरिहर चैतन्य सेवाधाम,चैतन्य हिल्स भांबरवडी वाडी कन्नड यांचे होळी महोत्सवा निमित्त तीन दिवसीय गीता रामायण सत्संग महायज्ञ दि.11 मार्च ते 13 मार्च 2022 आयोजित करण्यात आलेला आहे. 
             या शोभायात्रेचा सुरवात यदलापुर पासून ते दहिफळ खंदारे येथील परमपूज्य महान तपस्वी योगानंद बापू यांच्या योगीधाम येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. या यात्रेमध्ये आनंद चैतन्य महाराज व योगानंद बापू यांचे विविध गावातील नागरिकाकडून सन्मान होणार असून भाविकांना या माध्यमातून बापू कडून आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तीन दिवसीय या सत्संगामध्ये सत्संग, शोभायात्रा, दीप महोत्सव, भजन संध्या, होळी नृत्य, किर्तन आणि सर्व भाविकांचा तीन दिवसीय भोजनाचे सुद्धा नियोजन करण्यात आलेले आहे.त्याच प्रमाणे भाविकांना राहण्यासाठी येथे सुविधा सुद्धा या सत्संगाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्याचे भाग्य आपणास होणार असून या सोहळ्याला आपण सहपरिवार सह हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान योगानंद बापू सह साधक परिवार मंठा तालुका यांनी केले आहे. तसेच या धार्मिक कार्यक्रमाच्या सेवेच्या संधी साठी नवतरूणानी पुढाकार घेऊन या धर्मकार्यात सहभाग नोदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत