सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सचिन मगर यांचा पी.एचडी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन किसनराव मगर यांनी नुकतिच गणित या विषयात पीच.डी.(Ph.D.) ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी संपादन केली.
     सचिन मगर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गणित विभागाचे विभाग प्रमुख प्रा.डाॅ. कीर्तीवंत घडले यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन कार्य केले. " सम काॅन्ट्रीब्युशन टू फ्रॅक्शनल डिफ्रनशियल इक्वेशन्स युजिंग इंटिग्रल ट्रान्सफाॅर्न्स " असा विषय आहे. 
सचिन मगर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवा निवृत्त कार्यालयीन अधिक्षक किसनराव मगर यांचे चिरंजीव आहेत.
     सचिनच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.परतूर येथील पतंजली आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकचे डाॅ.दीपक दिरंगे यांनी त्याचा यथोचित सन्मान केला. या प्रसंगी माजी प्राचार्य डॉ.भगवान दिरंगे आणि मित्र मंडळी उपस्थित होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत