सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

वन्य प्राणी व मोकाट जनावरांनी दोन हेक्टर क्षेत्रावर पेरलेला हरबरा खाऊन केला फस्त..,शेतकऱ्याचे दिड ते दोन लाखांचे नुकसान...


मंठा प्रतिनिधी रवी पाटील 
मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कैलास रामराव सरकटे यांची साडेतीन एकर 
 व विष्णु रंगराव सरकटे यांची अडीच एकर जमीन आहे.
 कालच्या रात्री दि.2 मार्च रोजी नेमका काढणीला आलेला हरबरा या वन्य प्राण्यांनी खाऊन फस्त केल्याने रात्रंदिवस मशागत व खत पाणी घालुन जोरदार पिकविलेला हाता- तोंडाशी आलेला हरबरा फस्त झाल्याने शेतकरी कासाविस होऊन या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
तरी तालुक्यातील वन विभाग,महसुल विभाग तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे...
तळणी परीसातील विदर्भाच्या सिमेलगत मोठे वनिकरण असुन या व निकरणातील झाडी मध्ये रान गाई रोही रानडूक्कर निलगाई माकड यांचा व अन्यप्राण्याच्या ञासा सोबतच गावातील शंभर मोकाट जनावरांचा ञास गावखोरच्या शेतकर्याना होत असुन याचा बदोबंस्त होणे गरजेचे असलेच्या प्रतिक्रीया अनेक शेतकर्यानी व्यक्त केल्या
पोर्टल बंदच संबंधीत शेतकर्यानी नुकसानीची तक्रार म्हणून वन विभागाच्या अधिकार्याकडे तक्रार केली असता त्याना ऑनलाईन तक्रार करण्याची माहीती वन विभागाच्या अधिकार्याकडून दीली गेली पंरतू . ते पोर्टलच बंद असल्याने तक्रार करावी कोणाकडे असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे 
सपूर्ण मंठा तालूक्यातून बऱ्याच शेतकर्याच्या तक्रारी आहेत शेती मालाचा वान बघून त्याची नुकसान भरपाई दीले जाते शासन निर्णयानुसार कितीही नुकसान झाले तरी एक हजाराच्या वर नुकसान भरपाई देता येत नसल्याचे ता वन विभाग अधिकारी ऐ पी अटकल यांनी सांगीतले तसेच ऑनलाईन तक्रारीस काही अडचण असल्यास ऑफीस मध्ये येऊन तक्रार नोदवली जाईल

एकीकडे अतीवृष्टी तर कधी दुष्काळी, अस्मानी व सुलतानी संकट तसेच
विजेची हुलकावणी व घर सोडून रात्रंदिवस वन्य प्राण्यांचा सांभाळ करूनही हाता तोंडातशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्याचे आर्थीक नुकसान होत असून अशा संकटामुळे 
शेतकरी हतबल होत असुन वन विभाग याकडे सात्यत्याने दुर्लक्ष करीत आहे शेत पीकांचे नुकसान झाल्यावर ना कृषी अधिकारी याकडे लक्ष देतात ना वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.*
*केवळ तालुक्याच्या ठिकाणावरून वनविभागाचे कर्मचारी कित्येक वेळा नुकसान झाल्याच्या तक्रारी करून सुध्दा ना पंचनामा होतो ना शेतकर्याना ना मदत मिळते वनविभागाचे अधिकारी तालूक्याच्या ठिकाणावरून कारभार सांभाळत असल्याचे मत शेतकरी कैलास सरकटे यानी व्यक्त केले ..*

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत