लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

वन्य प्राणी व मोकाट जनावरांनी दोन हेक्टर क्षेत्रावर पेरलेला हरबरा खाऊन केला फस्त..,शेतकऱ्याचे दिड ते दोन लाखांचे नुकसान...


मंठा प्रतिनिधी रवी पाटील 
मंठा तालुक्यातील तळणी येथील शेतकरी कैलास रामराव सरकटे यांची साडेतीन एकर 
 व विष्णु रंगराव सरकटे यांची अडीच एकर जमीन आहे.
 कालच्या रात्री दि.2 मार्च रोजी नेमका काढणीला आलेला हरबरा या वन्य प्राण्यांनी खाऊन फस्त केल्याने रात्रंदिवस मशागत व खत पाणी घालुन जोरदार पिकविलेला हाता- तोंडाशी आलेला हरबरा फस्त झाल्याने शेतकरी कासाविस होऊन या शेतकऱ्याचे जवळपास दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
तरी तालुक्यातील वन विभाग,महसुल विभाग तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे...
तळणी परीसातील विदर्भाच्या सिमेलगत मोठे वनिकरण असुन या व निकरणातील झाडी मध्ये रान गाई रोही रानडूक्कर निलगाई माकड यांचा व अन्यप्राण्याच्या ञासा सोबतच गावातील शंभर मोकाट जनावरांचा ञास गावखोरच्या शेतकर्याना होत असुन याचा बदोबंस्त होणे गरजेचे असलेच्या प्रतिक्रीया अनेक शेतकर्यानी व्यक्त केल्या
पोर्टल बंदच संबंधीत शेतकर्यानी नुकसानीची तक्रार म्हणून वन विभागाच्या अधिकार्याकडे तक्रार केली असता त्याना ऑनलाईन तक्रार करण्याची माहीती वन विभागाच्या अधिकार्याकडून दीली गेली पंरतू . ते पोर्टलच बंद असल्याने तक्रार करावी कोणाकडे असा प्रश्न शेतकर्याना पडला आहे 
सपूर्ण मंठा तालूक्यातून बऱ्याच शेतकर्याच्या तक्रारी आहेत शेती मालाचा वान बघून त्याची नुकसान भरपाई दीले जाते शासन निर्णयानुसार कितीही नुकसान झाले तरी एक हजाराच्या वर नुकसान भरपाई देता येत नसल्याचे ता वन विभाग अधिकारी ऐ पी अटकल यांनी सांगीतले तसेच ऑनलाईन तक्रारीस काही अडचण असल्यास ऑफीस मध्ये येऊन तक्रार नोदवली जाईल

एकीकडे अतीवृष्टी तर कधी दुष्काळी, अस्मानी व सुलतानी संकट तसेच
विजेची हुलकावणी व घर सोडून रात्रंदिवस वन्य प्राण्यांचा सांभाळ करूनही हाता तोंडातशी आलेला घास हिरावल्याने शेतकर्याचे आर्थीक नुकसान होत असून अशा संकटामुळे 
शेतकरी हतबल होत असुन वन विभाग याकडे सात्यत्याने दुर्लक्ष करीत आहे शेत पीकांचे नुकसान झाल्यावर ना कृषी अधिकारी याकडे लक्ष देतात ना वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे.*
*केवळ तालुक्याच्या ठिकाणावरून वनविभागाचे कर्मचारी कित्येक वेळा नुकसान झाल्याच्या तक्रारी करून सुध्दा ना पंचनामा होतो ना शेतकर्याना ना मदत मिळते वनविभागाचे अधिकारी तालूक्याच्या ठिकाणावरून कारभार सांभाळत असल्याचे मत शेतकरी कैलास सरकटे यानी व्यक्त केले ..*

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत