सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दैठणा फाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहास उद्या पासून सुरुवात

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 
तालुक्यातील दैठणा फाटा येथे प.पू ब्रम्हनिष्ठ गुरु गंगाभारती महाराज  यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहास आज पासून सुरुवात होऊन दि. ९ ते १५ मार्च दरम्यान  दैनदिन
कार्यक्रम, भागवत कथा तसेच नामवंत किर्तनकार या सोहळ्यात कीर्तन प्रवचन होणार असल्याची माहिती पंच कमिटीने दिली आहे.
दैठणा फाटा येथे होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहात सकाळी काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन, हरिपाठ, रात्री साडेआठ ते साडेदहा हरी कीर्तन व जागर आयोजन करण्यात आले आहे.
दि ९ मार्च पासून या सप्ताहास उत्साहात प्रारंभ होत आहे. या सप्ताहात पहिल्या दिवशी हभप योगेश महाराज आकात सातोना यांचे रात्री कीर्तन होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी वारकरी भूषण दत्ता महाराज सिंगोनकर, हभप शीतलताई साबळे अहमदनगर, हभप कृष्णा महाराज शिंदे शहापूरकर, हभप ज्ञानेश्वर महाराज कोठूळे मुंबई, हभप भगवताचा-र्य रूपालीताई सवने महाराज, तर दि १५ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता काल्याचे कीर्तन हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे होणार आहे. या सप्ताहात भागवत कथा सकाळी १० ते २ वाजे पर्यंत आयोजन संपत भानूदासराव टकले यांनी केले आहे. भागवत कथा प्रवक्ते भागवताचा-र्य हभप नामदेव महाराज शास्त्री शिळवणीकर यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहा निमित्ताने होणाऱ्या कीर्तन व भागवत श्रवणचा लाभ घ्यावा असे आवाहन  पंचकमिटी दैठणा खु. व बु. यांनी केले आहे.
 

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत