लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

महेश भालेकर यांची पारडगाव येथील राशन दुकानावीरो धात तक्रार अर्ज तहसील कार्यालय घनसावंगी यांना सादर..


 प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
घनसावंगी तालुक्यातील पार डगाव येथील रहिवासी महेश नामदेव भालेकर यांनी गावातील रेशन दुकानदार असेफा सर फरोउद्दीन यांनी मागील चार महिन्यांमध्ये केवळ एक वेळेस रेशन वितरित केले आहे तसेच हे दुकानदार जनतेचे ऐकून घेत नाहीत. त्यांना वेळेवर रेशन देत नाही त्यांना रेशन मागण्यासाठी गेले असता उलट-सुलट भाषेचा वापर करून उत्तर देतात व ते नेहमी सांगतात की मी गावाचा आहे किंवा माझ्या मागे काम आहे असे उत्तर देऊन राशन देण्यास नागरिकांना टाळाटाळ करतात. काही निराधार कुटुंबांना केसरी कार्ड प्रमाणे रेशन वितरित केल्या जात आहे गावकरी मंडळी कडून शासन दरापेक्षा अधिक प्रमाणात शुल्क सुद्धा राशन दुकान दुकानदाराकडून आकारले जात आहे हा सर्व प्रकार तक्रारी अर्ज मार्फत तहसील कार्यालय घनसावंगी येथे महेश भालेकर यांनी दिला आहे तहसीलदार हे चौकशी करून या राशन दुकानावरती काय कारवाई करणार आहेत याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत