सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर ते चौंडी विशेष बस सेवेसाठी परतूर आगार प्रमुख यांना निवेदन...



परतूर प्रतिनिधी/ हनुमंत दंवडे
31 मे रोजी चौंडी येथे होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवासाठी परतुर आगारातून विशेष बस सेवा सोडण्याची मागणी आगार प्रमुख यांना मौर्य क्रांती संघ परतूर यांच्या नेतृत्वा खाली एका निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली
       31 मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे भव्यदिव्य जन्मोत्सव साजरा केला जातो .या निमित्ताने चौंडी येथे देशभरातून हजारो भाविक भक्त अहिल्या प्रेमी जमा होतात ,परतूर तालुक्यातील चौंडी येथे जाणाऱ्या भाविक भक्त व अहिल्याप्रेमीची संख्या मोठी आहे. परतूर तालुक्यातील हजारो लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी चौंडी येथे जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी परतुर आगारातून म्हणजे परतुर, आष्टी, लोणी ,माजलगाव या ठिकाणावरून बस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली माननीय जिल्हाधिकारी आणि परिवहन मंत्री यांना या निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या . निवेदना वरील सह्या हनुमंत दवंडे ,दत्ता कोल्हे, विलास रोकडे ,भागवत रोकडे, विलास तरव टे, नामदेव गोरे, शिवाजी भालेकर ,बाबू गोसावी, शिवाजी तरवटे ,माऊली बोराटे, प्रमोद पिसाळ, कृष्णा गायकवाड, दादाराव बकाल , विलास रोकडे,राम दुगाने, कृष्णा गायकवाड, यावेळी आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत