सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र गायकवाड सेवानिवृत*

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दंवडे
येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र निवृत्ती गायकवाड हे दि ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत झाले या बद्दल त्यांचा उपविभागीय पोलिस अधिकारी आर डी मोरे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करून निरोप देण्यात आला.
यावेळी परतूर पोलिस ठाण्यात एका सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन दि ३१ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन पुंडगे, उपनिरीक्षक नितिन गट्टुवार, पोलिस कर्मचारी गजानन राठोड, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, अशोक गाढवे, संजय वैद्य, भागवत खाडे, नितिन बोंडारे, सुनील होंडे, माने, राम हाडे, दशरथ गोपानवाड, शाम पाढरपोटे, आबासाहेब बनसोडे, वाघ, संगीता मांडे, यांच्यासह आदि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत