बँकेच्या आर्थिक साहयातुन महिलांनी आर्थिक विकास साधावा स्टेट बँकेच्या वतीने २९ महिला बचत गटांना ७९ लाख रुपये कर्ज वितरण

परतूर – प्रतिनिधी हनुमंत दंवडे
महिलांनी मिळणार्‍या बचत गटाच्या कर्ज अर्थसाह्यतून आर्थिक नियोजन करून आपल्या कुटुंबाचा विकास साधावा असे आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते स्टेट बँकेच्या वर्धापन दिनी महिला बचत गटांना पंचायत समिति कार्यालयात २९ गटांना ७९ लाख रुपये कर्ज वाटप मेळाव्या प्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे कृषी अधिकारी रविंद्र डांगे, संदीप दाभाडे, भानूदास शिंदे, शेळके, ओम खरात, यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी म्हणाले महिलांनी व्यवसाय वाढीसाठी प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून फायदा घ्यावा. त्यासाठी बँक आर्थिक सहकार्य करण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी महिला बचत गटांनी आपली पत निर्माण करणे गरजेचे आहे. समूह ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपल्या माध्यमातून वंचित महिलाना गटात सामील करून घेण्याचे आवाहन केले. महिला समुहामुळे महिलांचा समाजात आत्मविश्वास वाढतो. समूह हा संघटितपणा शिकवतो. गटांनी व्यवसाय करतांना वेगवेगळ्या व्यवसायाची निवड करून व्यवसाय वाढवून आर्थिक विकास साधावा व आर्थिक सक्षम व्हावे.  तसेच आजचा बँकेच्या डिजीटल व्यवहाराच्या काळात महिलांनी बँकेच्या ग्रीन कार्ड वापर करून वेळेचा व पेपरलेस सुविधेचा लाभ घ्यावा. असे वाहन शेवटी सावजी यांनी केले आहे.


सीबीलमुळे भावी पिढीचे कर्जाचे दारे बंद
सध्या बँककडून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा करतांना सीबील विचारात घेतले जात आहे. ज्या नागरिकांचे व्यवहार चांगले असतील. किंवा ज्याची पत चांगली आहे. कुठलेही कर्ज थकलेले नाही. अश्या ग्राहकांना बँक कर्ज देते. यामध्ये कुठे सीबील खराब झाल्यास आपल्यासह भावी पिढीला कर्जाचे दारे बंद असल्याने घेतलेले कर्ज फेडावे. तसेच कुणाचे जामीनदार होतांना काळजी घ्यावी.*
         अतुल सावजी, (मुख्य शाखा व्यवस्थापक)

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले