सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित वृक्ष रोपन व फराळाचे वाटप

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
कृष्णगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी द्वारे श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित्ताने वृक्षारोपण व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ह.भ.प. विष्णु महाराज बादाड ह भ पअर्जुन महाराज बादाड अध्यक्ष्य किशोर भाऊ खंदारे   गोविंदराव खंदारे गणेश राव कापकर प्रभूसिंग चव्हाण सरपंच बबनराव खंदारे रामप्रसाद खंदारे कृष्णा खंदारे वसंत पवार रवी खंदारे आदीची उपस्थीती होती
       यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी विष्णु महाराज बादाड यानी वृक्षसंगोपणाचे फायदे उपस्थीताना पटवून दीले जास्तीत जास्त ऑक्सीजन देणारे झाडे लागल्या गेली पाहीजेत आँक्सीजनचे काय महत्व आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आले वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ झाली पाहीजे फक्त फोटो काढण्यापूरतीची वृक्ष लागवड उपयोगाची नाही लावलेल्या वृक्षाचे संगोपन होने ही काळाची गरज असुन प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावृन त्याचे संगोपन करावे  असे आवाहन बादाड महाराज यांनी केले तसेच यावेळी किशोर खंदारे यानीही मनोगत व्यक्त केले वृक्षसवर्धन व त्याचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा होणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीचे महत्व सध्याच्या पीढीला पटवून दीले तर येणारी पीढी सुध्दा त्याचे अनुक करण करेल वृक्ष लागवडीसाठी समाजाचा आग्रह असणे सुध्दा गरजेचे असल्याचे यावेळी खंदारे यानी सांगीतले यावेळी श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण सस्थेतील सर्व विद्यार्थ्यानी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा सकल्प बोलवून दाखवला

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत