सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित वृक्ष रोपन व फराळाचे वाटप

तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
कृष्णगंगा फार्मर प्रोडूसर कंपनी द्वारे श्री नेमिनाथ महाराज संस्थान येथे एकादशी निमित्ताने वृक्षारोपण व फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी ह.भ.प. विष्णु महाराज बादाड ह भ पअर्जुन महाराज बादाड अध्यक्ष्य किशोर भाऊ खंदारे   गोविंदराव खंदारे गणेश राव कापकर प्रभूसिंग चव्हाण सरपंच बबनराव खंदारे रामप्रसाद खंदारे कृष्णा खंदारे वसंत पवार रवी खंदारे आदीची उपस्थीती होती
       यावेळी मनोगत व्यक्त करते वेळी विष्णु महाराज बादाड यानी वृक्षसंगोपणाचे फायदे उपस्थीताना पटवून दीले जास्तीत जास्त ऑक्सीजन देणारे झाडे लागल्या गेली पाहीजेत आँक्सीजनचे काय महत्व आहे हे आपण कोरोना काळात अनुभवले आले वृक्ष लागवड ही एक लोक चळवळ झाली पाहीजे फक्त फोटो काढण्यापूरतीची वृक्ष लागवड उपयोगाची नाही लावलेल्या वृक्षाचे संगोपन होने ही काळाची गरज असुन प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावृन त्याचे संगोपन करावे  असे आवाहन बादाड महाराज यांनी केले तसेच यावेळी किशोर खंदारे यानीही मनोगत व्यक्त केले वृक्षसवर्धन व त्याचे संगोपन करण्यासाठी स्पर्धा होणे गरजेचे आहे वृक्ष लागवडीचे महत्व सध्याच्या पीढीला पटवून दीले तर येणारी पीढी सुध्दा त्याचे अनुक करण करेल वृक्ष लागवडीसाठी समाजाचा आग्रह असणे सुध्दा गरजेचे असल्याचे यावेळी खंदारे यानी सांगीतले यावेळी श्री संत नेमीनाथ महाराज वारकरी शिक्षण सस्थेतील सर्व विद्यार्थ्यानी लावलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा सकल्प बोलवून दाखवला

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत