सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर केल्याबद्दल बीड येथे धनगर समाज बांधवांकडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा

प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
 दि 24 ओबीसी समाजाचे रद्द झालेले आरक्षण पुन्हा लागू व्हावे यासाठी राज्यभर ओबीसी समाजातील संघटनेचा व ओबीसी नेत्यांचा संघर्ष चालूच होता ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान झाले होते. समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले जात होते काही निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाला संधी मिळत नव्हती ओबीसी समाजाचा राज्यभर मोठमोठाले आंदोलन, मोठमोठे मोर्चे ,मोठ मोठाले रस्ता रोको, करून सुद्धा या ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी व न्याय मिळवण्यासाठी सरकारकडे वेळोवेळी मागणी निवेदन ओबीसी नेते करत होते‌‌. परंतु या समाजाकडे दुर्लक्ष केले जात होते.
      राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर शिंदे- फडवणीस सरकारने काटेकोर पणे या ओबीसी समाजाकडे लक्ष देण्याचे काम केले व ओबीसी समाजाला न्याय मिळवण्यासाठी लक्ष दिले‌‌.
    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्यासमोर प्रकाश भैय्या सोनसळे ओबीसी नेते यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला आरक्षण मंजूर झाल्याबद्दल प्रकाश भैय्या सोनसळे यांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला यामध्ये सर्व समाज बांधव नेते कार्यकर्ते यांनी सहभागी होऊन आनंद साजरा करण्यात आला.
   सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेऊन ओबीसी समाजाला न्याय दिला या निर्णयाचा धनगर समाजाचे नेते प्रकाश भैय्या सोनसळे यांनी शिंदे व फडणवीस सरकारचे अभिनंदन केले व असेच सहकार्य असेच प्रेम व धनगर आरक्षणाचा लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन यांना निवेदन देणार आहे असेही प्रकाश भैया सोनसळे यांनी म्हटले आहे.
  यावेळी हनुमंतरावजी काळे साहेब, नारायणजी भोंडवे सरपंच, भारत गाडे, ओंकार काळे, कैलास पांढरे ,अशोकराव पांढरे, शुभम भोंडवे सुदर्शन दादा भोंडवे , माऊली मारकड,मारकड ताई ,रोहन काळे, सरपंच बंगाल, आण्णा निर्मळ, प्रमोद गाडे,निलेश अडाले,पाराजी अडाले,मारकड भैय्या,हानुमंत राहींज, भोंडवे भैय्या आदी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत