सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा जागर करण्यासाठी एकत्र या........ प्रकाश सोनसळे


बीड प्रतीनीधी
आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साप्ताहिक परिवर्तन अभिवादन सभा मा प्रकाश  सोनसळे अध्यक्ष- धनगर समाज महाराष्ट्र राज्य हे अणेक दिवसांपासून आयोजन करत आहेत.
    आज बीड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहारहार अर्पण करून अभिवादन माऊली मारकड, लिंबाजी महानोर, विठ्ठल शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले.
 राजे मल्हारराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अनिल शेळके ,यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी चांगण , यांच्या हस्ते करण्यात आले.
    समाज बांधवांना संबोधित करताना प्रकाश  सोनसळे यांनी म्हटले की अहिल्यादेवी होळकरांचे विचार व कार्याचा जागर करण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र यावे.
  यावेळी हनुमंत काळे कृषी अधिकारी बीड ,रवींद्र गाडेकर माजी सरपंच पारगाव , साईनाथ कैतके सरपंच धनगरवाडी, बाळासाहेब ढवळे, दत्ता किवणे, अंकुश गवळी पत्रकार,विशाल प्रभाळे,बाबर ,राजु खंडागळे,रामा लकडे,चांगण ,मारकड टेलर, काळे ,शेळके ,आदी समाज बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत