लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

आमदार बबनराव लोणिकर यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे -शुभम कठोरे

परतूर प्रतीनिधी हनुमंत दवडे
आमदर_बबनरावजी_लोणीकर_साहेब हे लहान पणा पासुनच भारतीय जनता पक्षाचे चाहते आहेत.पुर्वी कांग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नेहमी केंद्रात व राज्यात राहायची. पंरतु सत्ता असो किंवा नसो लोणीकर साहेब हे एकनिष्ठ स्व, गोपिनाथरावजी मुंडे साहेब, स्व, प्रमोदजी महाजन, साहेब यांच्या सोबत राहून परतुर मंठा मतदारसंघातील सर्व साधारण जनतेची सेवा केली, ते लोणी ग्रामपंचायत पासुन त्यांनी महाराष्ट्र राज्याची पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ही धुरा सर्व जनतेला सोबत घेऊन सांभाळली, त्यांना पद कोणतेही असो त्यांनी त्या पदाला साध्य नाही तर साधन समजल आणि त्या साधनातुन परतुर मंठा मतदारसंघाची सेवा च नाही तर परीवर्तन घडविण्याचे काम केले, मागील भाजपा व शिवसेना मंत्री मंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे पद दिले होते त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबाला शौचालय दिले, शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले त्यांचा कार्यकाळात महाराष्ट्राला पाण्या अभावी दुष्काळाची झळ ही देखील लागु देली नाही  आता  एकनाथ संभाजी शिंदे साहेब व देवेेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे व भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापित झालेले आहे नवीन मंत्री मंडळाची निवड होणार असून त्यामधे परतुर मंठा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना मंत्री मंडाळात घ्यावा अशी मतदारसंघातील जनतेची नम्रतेची विनंती आहे..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत