सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आमदार बबनराव लोणिकर यांना मंत्री मंडळात स्थान देण्यात यावे -शुभम कठोरे

परतूर प्रतीनिधी हनुमंत दवडे
आमदर_बबनरावजी_लोणीकर_साहेब हे लहान पणा पासुनच भारतीय जनता पक्षाचे चाहते आहेत.पुर्वी कांग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता नेहमी केंद्रात व राज्यात राहायची. पंरतु सत्ता असो किंवा नसो लोणीकर साहेब हे एकनिष्ठ स्व, गोपिनाथरावजी मुंडे साहेब, स्व, प्रमोदजी महाजन, साहेब यांच्या सोबत राहून परतुर मंठा मतदारसंघातील सर्व साधारण जनतेची सेवा केली, ते लोणी ग्रामपंचायत पासुन त्यांनी महाराष्ट्र राज्याची पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ही धुरा सर्व जनतेला सोबत घेऊन सांभाळली, त्यांना पद कोणतेही असो त्यांनी त्या पदाला साध्य नाही तर साधन समजल आणि त्या साधनातुन परतुर मंठा मतदारसंघाची सेवा च नाही तर परीवर्तन घडविण्याचे काम केले, मागील भाजपा व शिवसेना मंत्री मंडळात त्यांना कॅबिनेट मंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री हे पद दिले होते त्यांनी संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक कुटुंबाला शौचालय दिले, शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार अभियान राबविले त्यांचा कार्यकाळात महाराष्ट्राला पाण्या अभावी दुष्काळाची झळ ही देखील लागु देली नाही  आता  एकनाथ संभाजी शिंदे साहेब व देवेेंद्र साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिंदे व भाजपा सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापित झालेले आहे नवीन मंत्री मंडळाची निवड होणार असून त्यामधे परतुर मंठा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बबनरावजी लोणीकर साहेब यांना मंत्री मंडाळात घ्यावा अशी मतदारसंघातील जनतेची नम्रतेची विनंती आहे..

Comments