सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

देवर्षी संगीत विद्यालयाचा देशभक्तांना समर्पित देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम रंगला

*

परतूर: प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रामेश्वर नरवडे संचलित देवर्षि संगीत विद्यालयातर्फे 'एक शाम शहीदो के नाम' हा देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम वरद विनायक लॉन्स येथे कार्यक्रम थाटात संपन्न झाला. 
कार्यक्रमाचे माजी नगराध्यक्ष मा श्री विनायक काळे, विजय नाना राखे, श्याम तेलगड, कल्याण बागल, प्रकाश बापू सोळंके मुरलीधर देशमुख,अविनाश शहाणे, प्रवीण डुकरे, कृष्ण आरगडे , डॉ.ज्ञानदेव नवल डॉ संजय पुरी, डॉ.प्रमोद आकात, शत्रुघ्न कणसे आदी मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रामेश्वर नरवडे यांनी केले. 
त्यानंतर संगीत विद्यालयाचे विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 
त्यामध्ये वैष्णवी वाकडे हिने देश रंगीला रंगीला दिल दिया है जान भी देंगे संशारदा राज मुंडे यांनी ए मेरे वतन के लोगो दिपाली कुलकर्णीने जयोस्तुते श्री महन्मंगले, रामेश्वर नरवडे यांनी जहा डाल डाल पर सोनेकी, हे राष्ट्र देवतांचे, अमृता नरवडे हिने तेरी मिट्टी मे मिल जावा, व्यंकटेश व्यास यांनी 'संदेसे आते है' तर 'तेरी मिट्टी मे मिल जावा' सत्यम शिवम सुंदरम, व हे गीत निकिता
 बंड हिने, ऍड.केदार शर्मा आणि बाबासाहेब कवडे यांनी एकत्रितपणे 'है प्रीत जहा की रीत सदा' हे बहारदार गाणं गाऊन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती तसेच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले माजी सैनिक सपत्नीक या कार्यक्रमाला हजर होते. 

माजी सैनिकांसाठी तसेच शहिदांसाठी अर्पण असलेल्या या देशभक्तीपर गीताच्या कार्यक्रमाने संपूर्ण परतुरकरांची मने जिंकून घेतली. मान्यवरांनीही देवर्षि संगीत विद्यालयाच्या या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.लंका सोनवणे यांनी केले तर शेवटी
आभार आयोजक देवर्षि संगीत विद्यालय आणि संयोजन समिती परतुर च्या वतीने प्रा.रामेश्वर नरवाडे सर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत